Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

२४ तासांत ४३ हजार २११ नव्या कोरोनाबाधितांची वाढ

Webdunia
शनिवार, 15 जानेवारी 2022 (08:40 IST)
कोरोना रुग्णसंख्येत घट दिसून आली. मात्र दुसऱ्या बाजूला ओमिक्रॉन रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ४३ हजार २११ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून १९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७१ लाख २४ हजार २७८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४१ हजार ७५६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज राज्यात दुसऱ्याबाजूला २३८ नव्या ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली असून एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या १ हजार ६०५वर पोहोचली आहे. सध्या राज्यात २ लाख ६१ हजार ६५८ सक्रीय रुग्ण आहेत.
आज दिवसभरात राज्यात ३३ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ६७ लाख १७ हजार १२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.२८ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९८ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी १५ लाख ६४ हजार ७० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७१ लाख २४ हजार २७८ (९.९६टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९ लाख १० हजार ३६१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९ हजार २८६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज पहिल्यांदाच २३८ एवढे ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. आज पुणे मनपामध्ये १९७, पिंपरी चिंचवडमद्ये ३२, पुणे ग्रामीण आणि नवी मुंबई प्रत्येकी ३, मुंबई २ आणि अकोला १ असे ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments