Festival Posters

राज्यात ६७,१६० नवीन रुग्णांची नोंद

Webdunia
रविवार, 25 एप्रिल 2021 (08:51 IST)
महाराष्ट्रात कोरोनाचा धोका कायम असून शनिवारी ६७,१६० नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४२ लाख २८ हजार ८३६ झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ लाख ९४ हजार ४८० वर पोहोचली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,५४,६०,००८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४२,२८,८३६ (१६.६१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४१,८७,६७५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून २९,२४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यात ६७६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ७१, रायगड २०, नाशिक ३५, अहमदनगर ३०, पुणे २२, सोलापूर ४८, सातारा २३, रत्नागिरी २५, हिंगोली ११, लातूर २९, उस्मानाबाद १२, बीड २८, नांदेड ६१, अमरावती १०, यवतमाळ २५, नागपूर ५७, वर्धा २०, भंडारा २५, गडचिरोली २२ यांचा समावेश आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५१ टक्के एवढा आहे. तर  ६३,८१८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३४,६८,६१० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.०२ टक्के एवढे झाले आहे.
 
मुंबईत ५८६७ नवे रुग्ण
मुंबईत शनिवारी ५८६७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या ६ लाख २२ हजार १४६ इतकी झाली आहे. तसेच शनिवारी कोरोनामुळे ७१ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यंत एकूण १२ हजार ७२६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

नीट यूजी पुनर्परीक्षासाठी रेल्वेचा विशेष उपक्रम; नांदेड विभागाकडून या ६ पॅसेंजर गाड्यांमध्ये अतिरिक्त जनरल डबे जोडले जाणार

नसरापूर प्रकरणात आरोपीने न्यायालयात बलात्कार आणि हत्येचे आरोप फेटाळले

LIVE: गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर छत्रपती संभाजीनगर येथील पाच पर्यटक बुडाले

रत्नागिरीतील गणपतीपुळे येथे समुद्राच्या लाटांमध्ये पर्यटक वाहून गेले; पाच जणांचा बुडून मृत्यू

नीट यूजी पुनर्परीक्षा: मोठा निष्काळजीपणा! नागपूरच्या विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र अबू धाबीत; शनिवार संध्याकाळपर्यंत दुरुस्तीचे आश्वासन

पुढील लेख
Show comments