Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात मार्च महिन्यात तिसऱ्यांदा एकाही कोरोना मृत्यूची नोंद नाही

Webdunia
गुरूवार, 10 मार्च 2022 (12:58 IST)
राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे.  राज्यात बुधवारी 359 नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात मार्च महिन्यात तिसऱ्यांदा एकाही मृत्यूची नोंद झालेली नाहीये. यापूर्वी 7 मार्च आणि 2 मार्चला एकाही मृत्यूची नोंद झालेली नव्हती. राज्यातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या 78 लाख 69 हजार 857वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत 1 लाख 43 हजार 745 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 3 हजार 9 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.
 
राज्यातील ५५९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण 77 लाख 19 हजार 100 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.08% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7 कोटी 84 लाख 19 हजार 100 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 78 लाख 69 हजार 857 (10.04 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 27 हजार 116 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 604 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Boycott Turkey मुंबई विमानतळावर तुर्की सेवा बंद होणार! शिवसेनेने गोंधळ घातला, बंद केल्यास काय परिणाम होईल?

कोण आहे विजय शाह? ज्यांच्याविरुद्ध कर्नल सोफियाबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे FIR दाखल

२७ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार, देशातील १४ राज्यांमध्ये वादळासह पावसाचा इशारा जारी

LIVE: पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ मे पर्यंत २९ बेकायदेशीर बंगले पाडले जातील

म्यानमारपासून कच्छपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले

पुढील लेख
Show comments