Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात पुन्हा एकदा नाईट कर्फ्यू लागू करण्याचा विचार

Webdunia
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (21:54 IST)
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या  पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून विविध उपाययोजना सुरू  केल्या असून, यानुसार राज्य सरकार महाराष्ट्रात पुन्हा एकदा नाईट कर्फ्यू लागू करण्याचा विचार करत आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्याबाबतचे संकेत दिले आहेत.
 
वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जर स्थिती सुधारली नाही,तर महाराष्ट्रात संध्याकाळी 6 ते रात्री 8 पर्यंत नाइट कर्फ्यू लागू केला जाऊ शकतो.
 
मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक यासारख्या शहरात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे.  राज्य सरकारकडून कोरोनाचे नियम पालन करा, असे आवाहन केले  मात्र सर्वसामान्य जनतेकडून हे नियम पायदळी तुडवले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार केला जात आहे.
सर्वसामान्यांनी कोरोनाच्या गाईडलाईन्स पाळाव्यात, यासाठी अनेक ठिकाणी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. सार्वजनिक ठिकाणी, लोकल ट्रेनमध्ये कोरोनाच्या गाईडलाईन्सचे पालन करावे, असेही सांगितले जात आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

नीरज चोप्रा लेफ्टनंट कर्नलच्या मानद पदवीने सन्मानित

गुजरात टायटन्सने आयपीएलमध्ये इतिहास रचला

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटवणारी माहिती देणाऱ्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस शिवसेना कडून जाहीर

LIVE: मुंबईत लाडकी बहीण योजनेच्या खात्यातून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार, तिघांना अटक

मुंबईत लाडकी बहीण योजनेच्या खात्यातून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार, तिघांना अटक

पुढील लेख
Show comments