Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज ठाकरे यांच्या कडून कोकण विभाग पदवीधर जागेसाठी उमेदवारची घोषणा

Webdunia
सोमवार, 27 मे 2024 (09:20 IST)
येत्या 26 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार असून ही निवडणूक 4 मतदार संघात होणार आहे. या निवडणुकांसाठी राजकीय पक्षाची जय्यत तयारी सुरु आहे.  राज ठाकरे यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी कोकण मतदार संघाकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. 
कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनसेने आपल्या अधिकृत X अकाउंटवर परिपत्रक जारी करून माहिती दिली आहे. 
<

सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अभिजित पानसे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. @abhijitpanse pic.twitter.com/HhDzeihyde

— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) May 27, 2024 >
राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण मतदार संघ विभागासाठी अभिजित पानसे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.लोकसभा निवडणुकीत मनसेने बिनशर्त महायुतीला पाठिंबा दिला होता. तसेच महायुतीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या. 

आता मनसेने विधान परिषदेच्या निवडणुकीत आपला पक्षाकडून उमेदवार उतरवायचा निर्णय घेतला असून उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. हा उमेदवार मनसेचा की महायुतीचा असा प्रश्न उदभवत आहे. 
कोकण पदवीधर मतदार संघातून डावखरे हे भाजपचे उमेदवार असून त्यांचा कार्यकाळ संपत असून त्याच जागेवर मनसेने उमेदवार जाहीर केले आहे. विधान परिषद निवडणूक मतदान 26 जून रोजी होणार असून 1 जुलै रोजी निकाल लागणार आहे. 

Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments