Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विवाहित स्त्रियाच्या पायांच्या बोट्यात जोडवी घालण्याचे कारण काय आहे जाणून घ्या

Webdunia
रविवार, 9 मार्च 2025 (17:12 IST)
कोणत्याही प्रौढ पुरुषाकडे पहिले की तो विवाहित असेल किंवा नाही, हे खात्रीपूर्वक सांगता येणे तसे कठीण असते. पण गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि पायांच्या बोटांमध्ये जोडवी पाहिली, की ते धारण करणारी महिला विवाहित असते,
ALSO READ: लग्न आणि मंगलाष्टक विधी
हे ज्ञान सर्वमान्य आहे. पण हे धारण केले जाणारे अलंकार केवळ सौभाग्याची लक्षणे नसून ते धारण करण्यामागे देखील वैज्ञानिक कारणे आहेत. ती कारणे लक्षात घेता आपल्या पूर्वजांनी किती विचार करून काही पद्धती सुरु केल्या हे आपल्या लक्षात येईल. पायांच्या बोटांमध्ये जोडवी घालण्यामागे देखील वैज्ञानिक कारणे आहेत.
 
आजकाल पायांच्या कुठल्याही बोटांमध्ये जोडवी घालण्याची फॅशन आहे. तर्‍हेतर्‍हेची जोडवी आजकाल बाजारामध्ये उपलब्ध असतात. पण परंपरेनुसार पायांच्या अंगठ्यांच्या शेजारील, म्हणजेच दुसर्‍या बोटामध्ये जोडवी घातली जायला हवीत. पायांच्या अंगठ्याशेजारील बोटामध्ये जी नस असते, तिचा संबंध महिलेच्या गर्भाशयाशी आहे. ही नस महिलेच्या गर्भाशयाला नियंत्रित करते आणि रक्तदाबही संतुलित ठेवते. ह्या नसेवर, पायांमध्ये जोडवी घातल्याने दबाव पडतो व त्यामुळे या नसेशी निगडित अवयवांचे कार्य सुरळीत चालते.
ALSO READ: गौरीहार पूजा कशी करायची जाणून घ्या
पायांध्ये ज्या बोटांध्ये जोडवी घातली जातात त्या बोटाध्ये असलेल्या नसेचा थेट संबंध गर्भाशयाशी असतो. त्यामुळे पायांच्या बोटांमध्ये जोडवी घातल्याने महिलांच्या शरीरातील प्रजनन क्षमता चांगली राहते. तसेच जोडव्यामुंळे सायटिक नर्व्हवर दबाव येऊन त्याच्या आसपासच्या नसांमधील रक्ताभिसरण सुधारून गर्भाशय, मूत्रपिंड आणि आतड्यांमधील रक्तस्राव सुरळीत राहतो.
ALSO READ: वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी
पायांच्या बोटांमध्ये जोडवी घातल्याने प्रजनेन्द्रियांचे कार्य सुरळीत चालत राहून मासिक धर्म नियमित होतो. तसेच हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी जोडवी उपयुक्त असल्याचे म्हटले गेले आहे. चांदी ऊर्जावाहक आहे. त्यामुळे जमिनितली ऊर्जा पायांमधील चांदीच्या जोडव्यांमार्फत शरीरामध्ये येते. त्या ऊर्जेने शरीरामध्ये सतत उत्साह व स्फूर्तीता अनुभव होतो. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Shaniwar Upay शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील, तुमचे भाग्य उजळेल

आरती शनिवारची

प्रेमानंदजी महाराजांकडून जाणून घ्या सर्वात मोठे सुख कशात आहे?

शनिवारी जपावे हे 5 चमत्कारी मंत्र

Apara Ekadashi 2025 Naivedya अपरा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला हे पदार्थ अपिर्त करा, श्री हरीचा आशीर्वाद कायम राहील

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments