Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अध्यात्म म्हणजे काय ?

Webdunia
* अध्यात्म म्हणजे ईश्वराने माणूस म्हणून जन्म दिला आहे तर, माणसाने माणसांशी माणसांसारखे वागणे आणि, आपली नैतिक जबाबदारी पार पाडणे.
* अध्यात्म म्हणजे मुळात कोणतीही धार्मिक गोष्ट नाही.
* अध्यात्म म्हणजे वरिष्ठांच्या प्रती आदरभाव असणे.
* अध्यात्म म्हणजे कनिष्ठांच्या प्रती करुणाभाव असणे.
* अध्यात्म म्हणजे आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये अस वागणं.
* अध्यात्म म्हणजे वेद वाचण्यापेक्षा वेदना वाचता येणे. 
* अध्यात्म म्हणजे आपलं काम प्रामाणिकपणे करणं.
* अध्यात्म म्हणजे आपलं कौटुंबिक आणि सामाजिक कर्तव्य पार पाडणं.
* अध्यात्म म्हणजे मुक्या पशू-पक्ष्यांवर देखील प्रेम करणे.
* अध्यात्म म्हणजे निरपेक्ष सत्कर्म करणे.
* अध्यात्म म्हणजे नि:स्वार्थी सेवाभाव ठेवणे.
* अध्यात्म म्हणजे सदैव कृतार्थभाव असणे.
* अध्यात्म म्हणजे विना अपेक्षा कौतुक करणे.
* अध्यात्म म्हणजे आपण प्रत्येकाशी सद्भाव आणि सतभावाने राहणे.
* अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत सदैव असणे.
* अध्यात्म म्हणजे आपण या समाजाचं काही देणं लागतो, आणि ते आपण दिलेच पाहिजे अशी मानसिकता असणे.
* अध्यात्म म्हणजे गरजवंतांना यथा शक्ती मदत करणे.
* अध्यात्म म्हणजे आपल्या बरोबर इतरांची देखील प्रगती होवो हा भाव असणे.
* अध्यात्म म्हणजे साधं, सोपं, सरळ आणि निर्मळ असणं, दिसणं, आणि वागणं.
* अध्यात्म म्हणजे फक्त पूजा, अर्चना, प्रार्थना आणि भक्ती नव्हे तर, अध्यात्म म्हणजे केलेली पूजा, अर्चना, प्रार्थना आणि भक्ती याप्रमाणेच आपली प्रत्येक कृती असणे.
* अध्यात्म म्हणजे राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रीय संताचं सदैव स्मरण असणे.
* थोडक्यात अध्यात्म म्हणजे सकाळपासून रात्री झोपेपर्यंत नित्य कर्म, कर्तव्य पारदर्शक पद्धतीने करणे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

भगवान शिवाचे स्तोत्र विश्वेश्वरनीराजनम् दररोज म्हणा, फायदे मिळतील

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

श्रावणात या 7 गोष्टी घरात आणा, सुख-समृद्धी वाढेल

आरती सोमवारची-आधार चक्र नृत्य मांडिलें थोर

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments