Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवे नियम लागू झाल्यास भारतात व्हॉट्‌सअ‍ॅप बंद होणार?

Webdunia
शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019 (15:00 IST)
व्हॉट्‌सअ‍ॅपवरून अफवा पसरवणार्‍यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. भारतात व्यवसाय करणार्‍या सोशल मीडिया कंपन्यांसाठी सरकारने नवीन नियमावली तयार केली आहे. परंतु, सरकारचे नियम कठोर असल्याने त्याचा उलटा परिणाम व्हॉट्‌सअ‍ॅपवर होण्याची शक्यता आहे. सरकारचे प्रस्तावित नियम जर लागू झाले तर भारतातील व्हॉट्‌सअ‍ॅपची सेवा बंद होऊ शकते, अशी भीती एका अधिकार्‍याने वर्तवली आहे.
 
व्हॉट्‌सअ‍ॅपचे जगभरात 1.5 अब्ज ग्राहक आहेत. तर भारतात 20 कोटी ग्राहक आहेत. सोशल मीडिया कंपन्यांसाठी जगातील सर्वाधिक मोठी बाजारपेठ ही भारतात आहे. सरकारने या कंपन्यासाठी नवीन नियावली तयार केली आहे. प्रस्तावित नियमांमध्ये सर्वात जास्त चिंतेची बाब म्हणजे व्हॉट्‌सअ‍ॅपमधील मेसेजना ट्रेस करणे हे होय, असे व्हॉट्‌सअ‍ॅपचे कम्युनिकेशन प्रमुख कार्ल वूग यांनी सांगितले. व्हॉट्‌सअ‍ॅपमध्ये एन्ड टू एन्ड एनक्रिप्शन फीचर आहे. या फीचरमुळे व्हॉट्‌सअ‍ॅपवर मेसेज पाठवणारा आणि ज्याला मेसेज मिळाला आहे, असे दोघेच हा मेसेज वाचू शकतात. इतकेच काय तर व्हॉट्‌सअ‍ॅप कंपनीही हे मेसेज वाचू शकत नाहीत. सुरक्षेच्या दृष्टीने एन्ड टू एन्ड एनक्रिप्शन फीचर खूप महत्त्वाचे आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

कलियुगातील आईचे क्रूर कृत्य, प्रियकराकडून अडीच वर्षांच्या मुलीवर दुष्कर्म केल्यानंतर हत्या

महाराष्ट्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, आता CIBIL स्कोअर नसतानाही कर्ज उपलब्ध होणार

खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन

घरात घुसून धारदार शस्त्राने गळा चिरून महिलेची हत्या

महाराष्ट्रात २५ मे पर्यंत वादळांसह मुसळधार पावसाचा इशारा, आयएमडीने जारी केला इशारा

पुढील लेख
Show comments