Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

72 हजार रुपये अर्थव्यवस्थेला बूस्ट - राहुल गांधी

Webdunia
शनिवार, 27 एप्रिल 2019 (10:32 IST)
राहुल गांधी यांची सभा नुकतीच संगमनेर येथे पार पडली आहे. यावेळी ते बोलतांना म्हणाले की सत्तधारी भाजपने आश्वासन दिलेल्या 15 लाखांचं काय झाले, मात्र काँग्रेसने आश्वासन दिलेल्या न्याय योजनेचा देशाच्या अर्थव्यवस्थेला कसा फायदा होणार असून 72 हजार रुपये अर्थव्यवस्थेला बूस्ट मिळणार आहे असे सांगत त्यांनी विश्लेषण केलं. काँग्रेसने जाहीर केलेले 72 हजार रुपये अर्थव्यवस्थेचं नुकसान करणार नाहीत, उलट फायदाच करतील, असा दावा राहुल गांधींनी केला आहे. या संगमनेर येथील सभेला ते उशिरा पोहोचले यामुळे राहुल गांधींनी जनतेची माफी मागतिली आहे.राहुल गांधींच्या प्रवास करत असलेल्या विमानात तांत्रिक बिघाडामुळे दिवसभरातील सर्व सभांना उशिर झाला. परिणामी त्यांना संगमनेरमध्येही नियोजित वेळेत पोहोचता आलं नाही असे स्पष्ट केले.
 
काँग्रेसने जाहीर केलेले जे 72 हजार रुपये आहेत ते देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी इंधन ठरणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देशात नोटाबंदी करुन लोकांच्या खिशातला पैसा बँकात टाकला आहे यामुळे बाजारातील व्यवहार कमी आणि खरेदी कमी झाली, सोबतच उत्पादन घटलं आणि रोजगार गेले. मात्र जर  काँग्रेसची सत्ता आली तर व लोकांना 72 हजार रुपये दिल्यास लोक त्या पैशातून खरेदी करतील, त्यामुळे मागणी वाढेल आणि रोजगार वाढतील. अर्थतज्ञांनी याबाबत माहिती दिली, असा दावा राहुल गांधींनी केला आहे. शिवाय काँग्रेसची ही योजना अर्थव्यवस्थेसाठी एक इंधन असून बूस्ट देईल, अस राहुल म्हणाले आहेत. अहमद नगर येथून राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे नगर येथील लढत चुरशीची झाली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments