Marathi Biodata Maker

दीर्घायुषी होण्यासाठी कामातून सुट्टी घेणे आहे गरजेचे

Webdunia
आपल्याला दीर्घायुष्य लाभावे, असे सगळ्यांनाच वाटते. तुमचीही अशी इच्छा असेल तर तुम्हाला आपल्या कामातून काही दिवस सुट्टी घेऊन सहलीला जाण्याची गरज आहे, असा खुलासा एका नव्या अध्ययनातून झाला आहे. तब्बल 40 वर्षे सुरू असलेल्या या अध्ययनातून असे समोर आले आहे की, ज्या लोकांनी वर्षभरात तीनआठवड्यांपेक्षा कमी सुट्टी घेतली, त्यांच्या मृत्यूची शक्यता सुट्टी घेणार्‍या लोकांच्या तुलनेत तिप्पट जास्त होती. फिनलँडमधील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकीचे प्राध्यापक टीमो स्ट्रँडबर्ग यांनी सांगितले की, तुमची जीवनशैली हेल्थी आहे व तुम्ही आपल्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेता. त्यामुळे सुट्टी न घेता सतत घेतलेली कठोर मेहनत तुम्हाला काहीच हानी पोहोचवत नाही, असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, दीर्घायुष्य व तणावातून सुटका हे मुद्दे येतात तेव्हा फक्त आरोग्यदायक आहार व नियमित व्यायामच पुरेसा नाही. त्यासाठी तुम्हाला कामातून सुट्टी घेणे गरजेचे आहे. 1970मध्ये या अध्ययनाची सुरुवात झाली होती. त्यात 1919 ते 1934 दरम्यान जन्मलेल्या 1,200 मध्यमवयीन लोकांचा समावेश करण्यात आला होता. या सगळ्यांना उच्च रक्तदाब, धू्म्रपान व लठ्ठपणामुळे ह्रदयविकाराचा धोका होता. अध्ययनात सहभागी 50 टक्के  लोकांना व्यायाम, खाण्यापिण्याची पथ्ये, व्यसनमुक्ती व वजन नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला दिला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना लावला 'पूर्णविराम'; शशिकांत शिंदे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली

LIVE: पुण्यातील ७१० कोटी रुपयांचा कात्रज-कोंढवा रस्ते प्रकल्प भूसंपादनातील अडथळ्यांमुळे रखडला

'लाडकी बहीण योजना' बंद करा... मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला असे का म्हटले? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

राईड रद्द केल्यावरून गदारोळ: पुण्यात पाच जणांचा रॅपिडो चालकावर हल्ला; दगडांनी मारून केले जखमी

मुकुल चौधरी कोण आहे? ज्याने षटकारांचा वर्षाव करत कोलकाता विरुद्ध खेचून आणला विजय, सोशल मीडियावर नवा 'टायगर' म्हणून ट्रेंडिंग

पुढील लेख
Show comments