Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Maharashtra Elections 2024: मोदी सरकार वक्फ कायद्यात सुधारणा करणार, अमित शहांची घोषणा

Webdunia
बुधवार, 13 नोव्हेंबर 2024 (16:39 IST)
महाराष्ट्र निवडणुकीच्या तयारीला सर्व पक्ष लागले असून प्रचार सभा घेण्यात येत आहे. अमित शहा देखील प्रचार सभा घेत आहे. मुंबईत त्यानी सभेत बोलतांना नरेंद्र मोदी सरकार काहीही झाले तरी वक्फ बोर्ड कायद्यात लवकरात लवकर सुधारणा करेल आणि त्यानंतर कोणीही खाजगी जमीन वक्फ मालमत्ता म्हणून घोषित करू शकणार नाही, अशी गर्जना केली.
 
शहा म्हणाले की, महाविकास आघाडी या बदलांच्या विरोधात आहे, मात्र वक्फ बोर्डाबाबत कायद्यात सुधारणा करणारे विधेयक लवकरच संसदेत मंजूर केले जाईल. शहा म्हणाले की, आत्ताच आमच्या सरकारने वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा करण्यासाठी विधेयक आणले आहे.
 
काही दिवसांपूर्वी काँग्रेसशासित कर्नाटकातील गावे वक्फ मालमत्ता म्हणून घोषित करण्यात आली होती. अनेक मंदिरे, लोकांची घरे, शेतकऱ्यांची जमीनही वक्फ मालमत्ता म्हणून घोषित करण्यात आली, मात्र वक्फ बोर्ड कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर तुमची जमीन वक्फ म्हणून घेता येणार नाही.

ते म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकार वक्फ कायद्यात अचानक बदल करणार आहे, त्यानंतर कोणाचीही जमीन किंवा घर वक्फ मालमत्ता म्हणून घोषित होणार नाही. हा स्वतंत्र भारत आहे आणि कोणालाही हे करण्याची परवानगी नाही. असे ते म्हणाले.
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

भारताने बांगलादेशच्या या वस्तूंच्या आयातीवर बंदर बंदी घातली

LIVE: मंत्री छगन भुजबळ यांच्या स्वीय सहाय्यकाकडून खंडणी मागितली,आरोपीला अटक

RCB vs KKR : पावसामुळे टॉस न करता सामना रद्द, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण

मंत्री छगन भुजबळ यांच्या स्वीय सहाय्यकाकडून खंडणी मागितली,आरोपीला अटक

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments