Dharma Sangrah

आरटीजीएस करणे झाले सोपे, वेळेत झाला मोठा बदल

Webdunia
शुक्रवार, 31 मे 2019 (09:38 IST)
रिझर्व बॅंक ऑफ इंडीया (RBI) ने आरटीजीएस (रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट)चा वेळ वाढवून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत केला आहे. आतापर्यंत 4.30 वाजेपर्यंतच आरटीजीएस व्यवहार केला जायचा. सकाळी 8 वाजल्यापासून आरटीजीएसला सुरुवात होणार आहे. वेगवेगळ्या वेळात आरटीजीएसच्या माध्यमातून रक्कम हस्तांतरित करण्यावर वेगवेगळे शुल्क आकारण्यात येणार आहे. वेळेप्रमाणे शुल्क देखील बदलणार आहे. आरबीआयच्या वेबसाईटवर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. 
 
आरटीजीएस व्यवहार सकाळी 8 वाजता खुला होणार असून ग्राहकांसाठी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तर बॅंक अंतर्गत व्यवहारासाठी संध्याकाळी 7.45 आणि आयडीएल रिवर्सलसाठी संध्याकाळी 7.45 ते 8 वाजेपर्यंत वेळ असणार आहे. वेगवेगळ्या वेळात आरटीजीएसच्या माध्यमातून व्यवहार केल्यास वेगवेगळे शुल्क भरावे लागेल. सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंतच्या व्यवहारावर कोणते शुल्क लागणार नाही. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत च्या व्यवहारावर 2 रुपये, दुपारी 1 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच्या व्यवहारावर 5 रुपये आणि 6 वाजल्यानंतरच्या आरटीजीएस व्यवहारावर 10 रुपये शुल्क लागणार आहे. आतापर्यंत आरटीजीएसने 2 ते 5 लाखापर्यंतच्या व्यवहारास 25 रुपये आणि 5 लाखाहुन अधिक रक्कमेवर 55 रुपये शुल्क लागते. आरटीजीएसच्या माध्यमातून रक्कम हस्तांतरीत करण्यावर कोणतीही सीमा नाही. आरटीजीएसअंतर्गत ही सुविधा 1 जूनपासून लागू होणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीतून आपली उमेदवारी मागे घेतली

महाराष्ट्रातील पहिली सीबीएसई जिल्हा परिषद शाळा पुण्यात सुरू होणार, ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस उद्घाटन करणार

"आयटी कंपन्यांमधील धर्मांतर रॅकेट खपवून घेतले जाणार नाही," नाशिक प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

नाशिक : एका मोठ्या आयटी कंपनीत धर्मांतर रॅकेट: ९ पीडित समोर; सहा टीम लीडर्सना अटक

माजी भारतीय क्रिकेटपटूचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन

पुढील लेख
Show comments