suvichar

कोरोनाकाळात लग्न करताना लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी ...

Webdunia
गुरूवार, 28 जानेवारी 2021 (15:24 IST)
सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. मात्र कोरोनाकाळात लग्नाचं आयोजन करताना बर्यावच आव्हानांना सामोरं जावं लागत आहे. पाहुण्यांना बोलवण्यापासून सामाजिक अंतर राखणं, मास्क परिधान करूनही स्टायलीश दिसणं, सॅनिटायझरचा वापर अशा बर्या्च गोष्टी कराव्या लागत आहेत. भारतीय लग्नं शाही थाटात केली जातात. या लग्नामध्ये विविध सोहळ्यांचं आयोजन होतं, पाहुण्यांचीही रेलचेल असते. अशा परिस्थितीत कमी लोकांमध्ये लग्न करणं थोडं विचित्र वाटतं. पण यावरही पर्याय आहेत. थोडी कल्पकता दाखवून आणि विचारविनिमय करून कोरोना काळातही ड्रीम वेडिंग करता येईल. कोरोनाकाळात लग्न करताना नेमकं काय करता येईल याविषयी...
 
* सध्या ‘मिनिमोनी' हा शब्द चांगलाच गाजतोय. ‘मिनीमोनी' म्हणजे ‘मिनी सेरेमनी'. मिनिमोनीच्या आयोजनात अगदी मोजक्या, जवळच्या लोकांना बोलावलं जातं. यावेळी वधुवरांप्रमाणे नटून थटून फोटोशूट करता येईल. पण लग्नाचे विधी करता येणार नाहीत. यासाठी वेगळा मुहूर्त काढावा लागेल. यावेळी फक्त घरचे लोक उपस्थित असतील.
* मायक्रो वेडिंगचीही चलती आहे. अशी लग्नं 20 माणसांमध्ये लागतात. या छोटेखानी लग्नांमध्ये तुम्ही बिनधास्त मजा करू शकता. अर्थात कोरोनाचे नियम पाळूनच!
* घरात एकच लग्न असेल आणि अधिक पाहुण्यांना बोलवायचं असेल तर तुम्ही लग्नसोहळ्यांची विभागणी करू शकता. हळदी, संगीत, गृहमुख, लग्न, स्वागत समारंभ अशा वेगवेगळ्या प्रसंगी माणसांची विभागणी करता येईल.
* याच पद्धतीने मल्टी डे वेडिंग करता येईल. म्हणजे लग्नसोहळ्याआधी प्री वेडिंग लंग्नाचं आयोजन करता येईल. लग्नानंतर जेवण ठेवता येईल. काही पाहुण्यांसाठी ब्रंचचं आयोजन करता येईल. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पाहुण्यांना बोलावून लग्नसोहळा संस्मरणीय करता येईल.
* लग्नाच्या ठिकाणी काही फलक लावता येतील. या फलकांवर मास्क लावणं, सॅनिटायझरचा वापर, सामाजिक दुरावा, कोरोनाचा धोका अशा सूचना लिहून कोरोनाविषयक नियमांचं पालन करण्याबाबत विनंती करता येईल. 
अशा पद्धतीने कोरोनाकाळातही सुरक्षित विवाहसोहळे आयोजित करता येतील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

नवीन

आधार कार्ड अपडेट करणे का आवश्यक आहे? हे अपडेट्स न केल्यास अनेक कामांमध्ये अडथळा येऊ शकतो

नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये भव्य तिरंगा रॅली काढली, उद्धव ठाकरे यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणात नागपूर आणि संभाजीनगर येथे विशेष न्यायालये स्थापन होणार

पुढील लेख
Show comments