Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Feng Shui Tips: घराचा मुख्य दरवाजा असा ठेवा, नेहमी आनंदी राहाल

Webdunia
सोमवार, 14 फेब्रुवारी 2022 (12:37 IST)
फेंगशुई म्हणजेच चिनी वास्तुशास्त्र भारतीय वास्तुशास्त्राप्रमाणेच घर आणि आसपासच्या गोष्टींबद्दल सांगते. यासोबतच त्या गोष्टींबद्दलही सांगण्यात आले आहे, ज्यामध्ये घरामध्ये सुख समृद्धी येऊ शकते. जर घरामध्ये सुख नाही किंवा खूप मेहनत करूनही आर्थिक स्थिती सुधारत नसेल तर अशा परिस्थितीत फेंगशुईच्या वास्तु टिप्स पाळल्या पाहिजेत. घराच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी कोणते फेंगशुई उपाय अवलंबणे चांगले आहे हे जाणून घ्या. 
 
फेंगशुईनुसार हा मुख्य दरवाजा असावा
फेंगशुईनुसार घराच्या मुख्य दरवाजासमोर खांब असल्यास वास्तू दोष निर्माण होतो. अशा वेळी तो तोडण्याऐवजी त्यावर आरसा लावल्यास नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू देत नाही. 
 
फेंगशुईनुसार घराचे मुख्य प्रवेशद्वार असे असावे की प्रकाश आणि हवा येत राहते. मुख्य प्रवेशद्वाराजवळ गॅरेज किंवा इतर प्रवेशद्वार असू नये. 
 
घराच्या मुख्य दरवाजातून आवाज येत असेल तर तो ताबडतोब दुरुस्त करावा. कारण मुख्य दरवाजात आवाज आल्यावर घरात नकारात्मक ऊर्जा येते.
 
घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी मुख्य दरवाजा रोज स्वच्छ करा. आवश्यक असल्यास, आपण ते पेंट देखील करू शकता. 
 
घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ नेहमी स्वच्छतेची काळजी घ्या. तसेच, घरात प्रवेश करण्यापूर्वी शूज आणि चप्पल बाहेर काढा. 
 
फेंगशुईच्या नियमांनुसार, मुख्य दरवाजा आणि मागील दरवाजा कधीही सरळ रेषेत नसावा. असे झाल्यावर घरात नकारात्मक ऊर्जा संचारू लागते. 
 
घराच्या मुख्य दरवाजासमोर स्वयंपाकघर असेल तर हा दोष दूर करण्यासाठी तुम्ही मुख्य दरवाजावर क्रिस्टल बॉल टांगू शकता. निगेटिन ऊर्जा त्याच्या घरात येणार नाही.  
 
(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. वेबदुनिया याची पुष्टी करत नाही.)

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

कुळदेवी-देवता स्वप्नात का दिसतात? यांचा अर्थ काय चला जाणून घेऊ घ्या

Shani Pradosh Vrat 2025 या दिवशी शनि प्रदोष व्रत राहणार, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत

Shaniwar Upay शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील, तुमचे भाग्य उजळेल

आरती शनिवारची

प्रेमानंदजी महाराजांकडून जाणून घ्या सर्वात मोठे सुख कशात आहे?

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments