rashifal-2026

मायाजाळ

Webdunia
एक खारुताई रोज आपले काम इमाने इतबारे करत असे.
ती जरुरीपेक्षा जास्त काम करून पण खुश राही.
कारण ती ज्या साठी काम करत होती त्या जंगलचा राजा सिंहाने तिला १० पोती अक्रोड द्यायचा शब्द दिला होता.
खारुताई काम करता करता थकली की तिला थोडा आराम करावा असे वाटे. पण तिला लगेच राजाचा शब्द आठवायचा आणि परत कामाला लागायची.
खारुताईला जेंव्हा इतर खारीं खेळतांना मस्ती करतांना दिसत तेंव्हा तिला पण खेळायची इच्छा व्हायची, पण लगेच तिला अक्रोड आठवायचे आणि ती परत कामाला लागायची.
राजा खूप इमानदार होता. त्याने शब्द दिला होता तर तो निश्चित पूर्ण करणार.
असाच एक दिवस उजाडला आणि सिंहाने खारुताईला १० पोती अक्रोड दिले आणि तिला स्वातंत्र्य बहाल केले.
अक्रोडांच्या पोत्यांवर बसून खारुताई विचार करू लागली की आता या अक्रोडांच मी काय करू? अख्ख आयुष्य काबाड कष्ट करून मी दातांचा भुगा करून घेतला आता अक्रोड चावायला दात कुठे आहेत?
 
ही गोष्ट आज आपल्या पैकी अनेकांची जीवन कहाणी बनली आहे.
माणूस आपल्या इच्छा मारत जीवनभर नोकरी-व्यवसाय करतो आणि पैसे कमवण्यात आयुष्य खर्ची घालवतो.
आणि निवृत्त अशा वयात होतो की ज्या पैशांसाठी आयुष्यभर काबाड कष्ट केले त्या पैशांचा उपभोग घ्यायची क्षमता नष्ट झालेली असते.
तोपर्यंत घर चालवण्यासाठी पुढची पिढी सारसावलेली असते. त्यांना या गोष्टीची कल्पना आणि जाणीव असेल का, की आपण हा फंड किंवा बँक खात्यात रक्कम शिल्लक ठेवण्यासाठी किती इच्छा मारल्या असतील? किती त्रास सहन केला असेल? किती स्वप्न अर्धवट राहिली असतील?
अशा फंडाचा आणि शिल्लक रकमेचा काय फायदा की जी कमावण्यासाठी आपलं अख्ख आयुष्य खर्च होतं आणि आपण त्याचा उपभोग पण घेऊ शकत नाही.
म्हणून खूप काम करूया, पण आनंद घेत घेत करूया.
व्यस्त राहूया पण आपली ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी उपलब्ध पण राहूया.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सुभेदार' मालिकेत बबली दीदीच्या भूमिकेत मोना सिंगचा नवा अवतार

'तुंबाड २' मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीची एन्ट्री; 'हस्तर'च्या रहस्यमय जगात साकारणार महत्त्वाची भूमिका!

या चित्रपटांमध्ये रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा एकत्र दिसणार

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नानिमित्त भारताच्या २३ शहरांमध्ये मिठाई वाटण्यात आली

राजपाल यादवने सुरु केला नवीन यूट्यूब चैनल

सर्व पहा

नवीन

राज-डीकेच्या सुपरहिरो चित्रपटात सलमान खानसोबत समंथा रूथ प्रभू?

Sheetala Saptami भारतातील प्रसिद्ध शीतला माता मंदिर

आलिया भट्टचा अ‍ॅक्शन चित्रपट 'अल्फा' प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर, या तारखेला प्रदर्शित होणार

ऑस्कर विजेता पटकथा लेखक जेरेमी लार्नर यांचे ८८ व्या वर्षी निधन

दक्षिणेकडून बॉलिवूडपर्यंत एकामागून एक हिट चित्रपट, रश्मिका मंदाना राष्ट्रीय क्रशपासून सुपरस्टार बनली

पुढील लेख
Show comments