Dharma Sangrah

अकबर बिरबल कहाणी : आर्धे बक्षीस

Webdunia
मंगळवार, 23 मार्च 2021 (19:25 IST)
ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा बादशहा अकबर आणि बिरबल प्रथमच भेटले होते. त्या वेळी बिरबल ला महेश दास म्हणून ओळखले जात होते. एके दिवशी बादशहा अकबर महेश दास म्हणजेच बिरबलाच्या चातुर्याने प्रभावित होऊन आपल्या दरबारात बक्षीस घेण्यासाठी बोलावतात आणि निशाणी म्हणून आपली अंगठी त्याला देतात. 
काही दिवसानंतर महेश दास बादशहांना भेटण्यासाठी जातात. महालात जाऊन ते बघतात की भलीमोठी रांग असते आणि तिथला पहारेकरी प्रत्येकाकडून काही न काही भेटवस्तू घेऊनच त्याला आत सोडत आहे.

महेश दास ची पाळी आल्यावर त्या पहारेकरीने त्याला अडविले आणि आत जाण्याचे कारण विचारले .तेव्हा महेश दास ने सांगितले की बादशहा ने मला बक्षीस घेण्यासाठी बोलाविले आहे बघा ही अंगठी .त्या पहारेकरीच्या मनात लोभ आला.त्याने विचार केला की ह्याला तर खूप बक्षीस मिळेल. त्याने लगेच महेशदास ला म्हटले की ठीक आहे तू आत जाऊ शकतो,परंतु  माझी अट आहे की तुला जे काही बक्षीस मिळेल त्यातून तू मला आर्धे देशील. तुला मान्य असेल तरच तू आत जाऊ शकतो. 

त्यांनी  होकार दिला आणि आत गेले आणि आत जाऊन थांबले. त्यांची पाळी आल्यावर बादशहाने त्यांना ओळखले आणि दरबारात त्यांच्या चातुर्याची प्रशंसा केली. त्यांनी महेश दास ला विचारले की आपल्याला काय पाहिजे. त्यावर त्यांनी मला बक्षीस म्हणून 100 चाबकाचे फटके द्यावे. बादशहा ने त्याला आश्चर्याने विचारले की आपण असे बक्षीस का मागत आहात. तेव्हा बाहेर जे काही घडले ते सर्व त्यांनी बादशहाला सांगितले आणि पहारेकरी काय बोलला आणि त्याच्या वर्तन बद्दल सार काही बादशहाला सांगितले .नंतर महेशदास म्हणाले की मी कबूल केले होते त्या प्रमाणे मला अर्ध बक्षीस म्हणजे 50 चाबकाचे फटके दिल्यावर उर्वरित 50 चाबकाचे फटके त्या पहारेकरी ला द्यावे. बादशहा खूप संतापले आणि त्यांनी त्या पहारेकरी ला बोलावून शिक्षा म्हणून 100 चाबकाचे फटके दिले आणि महेश दासच्या चातुर्यने प्रभावित होऊन त्याचे नाव बिरबल ठेवले. आणि आपल्या दरबारात त्यांची नेमणूक मुख्य सल्लागार म्हणून केली. त्या नंतर आजतायगत अकबर आणि बिरबलाच्या अनेक कथा प्रसिद्ध आहे.
 
शिकवण- आपण आपले कार्य प्रामाणिकपणे आणि कोणत्याही लोभाशिवाय केले पाहिजे. आपण काहीतरी मिळविण्याच्या आशेने काहीतरी केले तर आपल्याला नेहमीच वाईट परिणाम भोगावे लागतात. जस की त्या लोभी पहारेकरी बरोबर झाले. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

मुलांशी मैत्रीपूर्ण नाते कसे निर्माण कराल? जाणून घ्या या सोप्या Parenting Tips

अकबर-बिरबलची कहाणी : महागडा सुगंध

मुले पालकांच्या या सवयी आयुष्यभर विसरत नाहीत; प्रत्येक पालकाला त्या माहित असायला हव्यात

लग्नानंतर सासरच्यांसोबत बॉन्डिंग कसं वाढवाल? नव्या सुनेसाठी ५ सोप्या आणि प्रभावी टिप्स

गोड-आंबट वरण, महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक रेसिपी

पुढील लेख
Show comments