Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मंत्रालयासमोर पेटवून घेतलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू

Webdunia
सोमवार, 29 ऑगस्ट 2022 (21:24 IST)
पावसाळी अधिवेशन सुरू असताना मंत्रालयासमोर एक धक्कादायक घटना घडली होती. मंत्रालयासमोर एका शेतकऱ्याने आत्महदहनाचा प्रयत्न केला होता. जखमी अवस्थेत या शेतकऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान या शेतकऱ्याचा आज दुर्दैवी मृत्यू झाला.
 
सुभाष भानुदास देशमुख असं या शेतकऱ्याचे नाव आहे. सुभाष देशमुख हे उस्मानाबाद जिल्ह्यामधील वाशिम तालुक्यातील तांदूळवाडी गावचे रहिवासी होते. गावाकडे जमीन हडपल्याच्या वादातून देशमुख यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. २३ ऑगस्ट रोजी दुपारी मंत्रालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून देशमुख यांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याचवेळी तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी धाव घेत त्यांच्या हातातून पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली होती. या प्रकरणी देशमुख हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर जे.जे. रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची मृत्यूशी झूंज अखेरी ठरली. प्लास्टिक सर्जरी विभागाचे डॉक्टर सागर गुंडेवाल यांनी दुपारी बाराच्या सुमारास सुभाष देशमुख यांच्या मृत्यूबाबत माहिती दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अमळनेरजवळ मालगाडी रुळावरून घसरली, नंदुरबार-सुरत रेल्वे मार्ग विस्कळीत

LIVE: परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेस स्मार्ट केल्या जातील

पुण्यातील व्यावसायिकाला पाकिस्तानकडून धमकी

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

पुढील लेख
Show comments