Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आमिर खान करोना पॉझिटिव्ह; उद्धव ठाकरेंसोबत लावली होती कार्यक्रमाला हजेरी

Webdunia
बुधवार, 24 मार्च 2021 (16:23 IST)
बॉलिवूड अभिनेता आमिर खानला करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या आमिर खान क्वारंटाइन झाला असून, त्याच्या प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आमिर खानने दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत ‘वर्षा’वरील कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री निवासात करोनाचा शिरकाव झाला असून, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाही करोनाची लागण झाली आहे. आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे सध्या उपचार घेत असून, असं असतानाच दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यासोबत एका कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या आमिर खानलाही करोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे. आमिर खानच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे. “आमिर खानला करोनाचा संसर्ग झाला आहे. तो आता होम क्वारंटाइनमध्ये असून, त्याची प्रकृती उत्तम आहे. तसेच सर्व नियमांचं पालन करत आहे. आमिर खानच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी खबरदारीचा उपाय म्हणून चाचणी करून घ्यावी,” असं आमिरच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे.
 
जागतिक जल दिनाचे औचित्य साधून पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेचा गौरव सोहळा मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी झाला होता. हा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला होता. यावेळी आमिर खान आणि उद्धव ठाकरे शेजारीच बसलेले होते. त्याचबरोबर या कार्यक्रमाला राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, आमिर खानची पत्नी किरण राव आदी उपस्थित होते. त्यामुळे आता आमिरच्या संपर्कात आलेल्या सर्वांबरोबरच कदाचित मुख्यमंत्र्यांनाही करोना चाचणी करावी लागू शकते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

आर. प्रज्ञानानंदने सेंट लुईस रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेच्या रॅपिड गटात अव्वल स्थान पटकावले

नाशिक जिल्ह्यातील 'उधमाळ' ठरणार भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय 'डार्क स्काय' गाव

"देवेंद्रजींनी महाराष्ट्रातच राहावं!" – दिल्लीतील चर्चांवर अमृता फडणवीस पुन्हा बोलल्या; राजकीय वर्तुळात वक्तव्याची जोरदार चर्चा

मध्य रेल्वेने तिकीटविरहित किंवा अनधिकृत प्रवास करणाऱ्यांविरुद्ध कठोर नियम केले

"निवडून आलो म्हणजे सात-बारा आपला होत नाही" – एकनाथ शिंदे यांचा चार मंत्र्यांना थेट इशारा

पुढील लेख