Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

किरीट सोमय्या यांचे ठिय्या आंदोलन, पोलिसांनी कारवाई करत घेतले ताब्यात

Webdunia
सोमवार, 28 सप्टेंबर 2020 (17:41 IST)
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत मुंबई मनपा कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. त्यांनी अंगात निषेधाचे बॅनर घालून किशोरी पेडणेकरांचा निषेध व्यक्त केला. मात्र त्यावेळी पोलिसांनी कारवाई करत सोमय्यांना ताब्यात घेतलं. 
 
“महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरळी येथील गोमाता जनता एसआरएच्या जागेचा गैरव्यवहार केला आहे. त्यांच्यावर ताबडतोब कारवाई व्हावी आणि त्यांची हकालपट्टी करावी. याबाबत आम्ही बीएमसी आणि एसआरएकडे कारवाईची मागणी केली आहे. पुरावेही सादर केले आहेत. जर 48 तासामध्ये पेडणेकर यांच्यावर कार्यवाही झाली नाही, तर मी महापालिका समोर धरणा आंदोलन करेन, असे सांगितले होते.
 
त्यानुसार किरीट सोमय्या यांनी पालिका कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. महापालिकेच्या मुख्यालयात प्रवेश न दिल्याने त्यांनी मनपाच्या गेटसमोर हे आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान त्यांनी मुंबईच्या महापौरांची हकालपट्टी करा, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली.
 
यानंतर पोलिसांनी किरीट सोमय्या यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यांना पोलीस स्टेशनमध्येही नेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तुम्ही मला अटक करु शकत नाही, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांनी त्यांना कायदा समजवत त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

HSC Exam Result :महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार येथे पाहता येईल निकाल

भाजपने इंदिरा गांधींकडून शिकावे, पहलगाम हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपला दिला सल्ला

मिलिंद देवरा यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला, शिंदेंना बाळासाहेबांचे खरे वारस म्हटले

LIVE: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार

भारताने बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवला

पुढील लेख
Show comments