Publish Date: Wed, 22 Jul 2026 (19:49 IST)
Updated Date: Wed, 22 Jul 2026 (19:51 IST)
सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील सखल भागांमध्ये पूर आला आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
दोन दिवसांपासून मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात मान्सूनने जोर धरला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील वैतरणा, भातसा, उल्हास आणि काळू नद्यांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. तसेच जिल्ह्यातील प्रमुख धरणे ८० टक्क्यांहून अधिक भरली आहे.
मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे ठाणे-नाशिक महामार्ग आणि शिल-फाटा रस्त्यावर झाडे पडण्याच्या अनेक घटना घडल्या. कल्याण-डोंबिवलीतील काही रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली.
हवामान विभागाने २४ जुलैपर्यंत जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज वर्तवला आहे.
Edited By- Dhanashri Naik