Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईतील शाळा अनिश्चित काळासाठी बंद राहणार

Webdunia
शनिवार, 16 जानेवारी 2021 (07:52 IST)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा १५ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला होता. मात्र अन्य देशांमध्ये आलेले कोरोनाची दुसरी लाट अन्य राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता शाळा सुरू करण्यासंदर्भात १६ जानेवारीपासून महापालिका आयुक्तांचे पुढील आदेश मिळेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील शाळा अनिश्चित काळासाठी बंद राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई, आयबी या शिक्षण मंडळाना मुंबईमध्ये दहावी, बारावीच्या परीक्षा नियोजित वेळेनुसार घेण्यास नुकतेच मुंबई महापालिकेने परवानगी दिली होती. त्याचवेळी नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग १८ जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.  मात्र अन्य देशांमध्ये कोरोना विषाणूची पसरलेली दुसरी लाट व अन्य राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळा व सर्व विद्यालये १६ जानेवारीपासून मुंबई महापालिका आयुक्तांचे पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  
 
शाळा बंद ठेवण्याच्या सूचनेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी शिक्षण निरीक्षक, उपशिक्षणाधिकारी, सर्व प्रशासकीय अधिकारी (शाळा), पालिका क्षेत्रातील महापालिका प्राथमिक व माध्यमिक, खासगी अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना दिले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

HSC Exam Result :महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार येथे पाहता येईल निकाल

भाजपने इंदिरा गांधींकडून शिकावे, पहलगाम हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपला दिला सल्ला

मिलिंद देवरा यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला, शिंदेंना बाळासाहेबांचे खरे वारस म्हटले

LIVE: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार

भारताने बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवला

पुढील लेख
Show comments