suvichar

राहुल गांधींनी लोकशाहीचा आदर राखावा : भाजप

Webdunia
सोमवार, 26 डिसेंबर 2016 (11:23 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देणे थांबवून काँग्रेसचे उपाध्यक्ष  राहुल गांधी यांनी लोकशाहीचा आदर राखावा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाने केले आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय जनता पक्षाचे नेते श्रीकांक शर्मा म्हणाले, आठ नोव्हेंबरच्या निर्णयानंतर राहुल गांधींवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. काँग्रेसचे भ्रष्टाचाराशी फार जवळचे नाते आहे आणि नोटाबंदीच्या निर्णयामुळे त्यांच्या ना नात्याला धक्का पोचला आहे. येथे रोख आहे, तेथे कमिशन असते. जेथे कमिशन असते तेथे काँग्रेस असते. त्यामुळेच राहुल गांधी हे नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध करत आहेत. पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी काळ्या पैशाविरुद्ध मोहीम उघडली आहे. देशातील नागरिक त्याच्या मागे ठामपणे उभे आहेत. राहुल गांधी मात्र सर्वाधिक नाराज झाले आहेत.  त्यामुळेच ते निराधार वक्तव्य करत आहेत, अशी टीकाही शर्मा यांनी केले. नोटाबंदीच्या निर्णयावर राहुल गांधी वारंवार मोदी यांना लक्ष्य करत आहेत. मोदी यांचा निर्णय हा गरीब, शेतकरी आणि सर्वसामान्यांविरुद्ध असल्याची टीका ते करत आहेत. यंदाचे हिवाळी अधिवेशनही नोटाबंदीच्या मुद्दावरून वारंवार तहकूब झाले होते. 
सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

पुढील लेख
Show comments