rashifal-2026

रेशनच्या नियमांमध्ये मोठे बदल; जूनपासून लागू होणार

Webdunia
बुधवार, 25 मे 2022 (15:52 IST)
सरकारने रेशनच्या नियमात मोठा बदल केला आहे. हा बदल जून महिन्यापासून लागू होणार आहे. अशा परिस्थितीत सर्व शिधापत्रिकाधारकांना या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. 
 
केंद्र सरकारकडून राज्यातील शिधापत्रिकाधारकांना मोफत गहू आणि तांदूळ वाटप केले जाते. हे वितरण पीएम गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केले जाते. आता या योजनेत गव्हाऐवजी तांदूळ दिला जाणार आहे. असे झाल्यास जूनपासून तुम्हाला गहू कमी आणि तांदूळ जास्त मिळेल.
 
मोदी सरकारने गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मे ते सप्टेंबर या कालावधीत वाटप करण्यात येणारा गव्हाचा कोटा कमी केला आहे. या बदलानंतर यूपी, बिहार आणि केरळमध्ये गहू मोफत वितरणासाठी उपलब्ध होणार नाही.
 
तसेच दिल्ली, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये गव्हाचा कोटा कमी करण्यात आला आहे. 
या राज्यांमध्ये कार्डधारकांना गहू कमी आणि तांदूळ जास्त मिळेल. उर्वरित राज्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

पुढील लेख
Show comments