Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नववीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना आणखीन एक संधी

Webdunia
शुक्रवार, 28 एप्रिल 2017 (12:25 IST)

येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता नववी व दहावीच्या तीन विषयांची नैदानिक चाचणी घेण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे दहावीची बोर्डाची परीक्षा असतानादेखील ही नैदानिक चाचणी घेण्यात येणार आहे. तर या शैक्षणिक वर्षात जे नववीचे विद्यार्थी नापास झाले आहेत त्या विद्यार्थ्यांची जून महिन्यात पुन्हा एकदा परीक्षा घेतली जाणार आहे.

शासनाने यापूर्वीच नववी दहावीसाठीही नैदानिक चाचण्या घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र याची अंमलबजावणी कधीपासून होईल व कोणकोणत्या विषयांसाठी ही चाचणी घेण्यात येईल याबाबत स्पष्टता नव्हती. मात्र आता शासनाने येत्या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी होणार असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार जुलै महिन्यात इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांची नैदानिक चाचणी घेण्यात येणार असल्याचे शासनाने काढलेल्या अध्यादेशात म्हटले आहे. 

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments