Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिल्लीत संघर्ष विकोपाला, केजरीवाल - उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा

Webdunia
सोमवार, 18 जून 2018 (08:41 IST)
दिल्लीचे राज्यपाल अनिल बैजल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आहे. आता यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच निशाण्यावर आले आहेत. केजरीवाल यांनी गेला आठवडाभरराज्यपालांच्या निवासस्थानी धरणे धरले असून रविवारी संध्याकाळी आम आदमी पार्टीच्या हजारो कार्यकर्त्यांनी मंडी हाऊस येथून पंतप्रधानांच्या निवासस्थानी धडक मारली, तर दुसरीकडे दिल्लीतील या संघर्षावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी नीती आयोगाच्या बैठकीत मोदींना चांगलेच घेरले.
 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजधानीतील साऱ्या घटना, घडामोडींची माहिती देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि चर्चा केली. केजरीवाल सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील संघर्षाने दिल्लीत राजकीय कोंडी झाली आहे. चार मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या पाठीशी आहेत. त्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी ‘आप’च्या लढय़ाची माहिती उद्धव ठाकरे यांना दिली. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments