Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिल्लीत संघर्ष विकोपाला, केजरीवाल - उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा

Webdunia
सोमवार, 18 जून 2018 (08:41 IST)
दिल्लीचे राज्यपाल अनिल बैजल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आहे. आता यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच निशाण्यावर आले आहेत. केजरीवाल यांनी गेला आठवडाभरराज्यपालांच्या निवासस्थानी धरणे धरले असून रविवारी संध्याकाळी आम आदमी पार्टीच्या हजारो कार्यकर्त्यांनी मंडी हाऊस येथून पंतप्रधानांच्या निवासस्थानी धडक मारली, तर दुसरीकडे दिल्लीतील या संघर्षावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी नीती आयोगाच्या बैठकीत मोदींना चांगलेच घेरले.
 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजधानीतील साऱ्या घटना, घडामोडींची माहिती देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि चर्चा केली. केजरीवाल सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील संघर्षाने दिल्लीत राजकीय कोंडी झाली आहे. चार मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या पाठीशी आहेत. त्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी ‘आप’च्या लढय़ाची माहिती उद्धव ठाकरे यांना दिली. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

पुढील लेख
Show comments