Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मेट्रोच्या अर्धवट कामाचं उद्घाटन होतंय, पण…पवारांनी मोदींना उद्देशून म्हटले

Webdunia
शनिवार, 5 मार्च 2022 (15:20 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या (रविवारी) पुणे मेट्रोचं उद्धाटन होणार आहे. त्यादृष्टीने शहरात तयारीही सुरू आहे. या कार्यक्रमावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुणे मेट्रोचे काम अद्याप पूर्ण झालेले नसताना त्याचे उद्घाटन होत आहे. उद्या जर काही संकट निर्माण झाले तर त्याची जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागेल, असे पवारांनी मोदींना उद्देशून म्हटले आहे.
 
पवार म्हणाले, देशाचे पंतप्रधान उद्या पुण्यात मेट्रोच्या उद्घाटनासाठी येत आहेत. मोदी महापालिकेतून कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालय येथे पुणे मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन आणि मेट्रोने आनंदनगपर्यंतचा प्रवास करणार आहेत. मेट्रो सुरु करण्यात येणार आहे. एका महिन्यापूर्वी मेट्रोच्या प्रमुखांनी मला मेट्रो दाखवण्यासाठी नेले होते. जेथून मेट्रो धावणार आहे तेथून मी प्रवासही केला. त्यावेळी मेट्रोचे काम झालेले नाही हे माझ्या लक्षात आले. काम झालेले नसतानाही उद्घाटन होत आहे. माझी त्याबद्दल काही तक्रार नाही. पण उद्या जर काही संकट निर्माण झाले तर त्याची जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागेल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
 
आज नदी सुधार प्रकल्प हाती घेण्याची गरज आहे. पण मोदींचा सुधारणा करण्याऐवजी सुविधांवर भर आहे. नदी सुधारण्याचं काम हाती घेतलं पाहिजे. नदीवर अनेक धरणं आहेत. त्यामुळं कधी ढगफुटी झाली तर या मोठय़ा संकटाची झळ आजूबाजूच्या गावातील लोकांना बसणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments