Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सांगलीत बोट उलटून 16 ठार

Webdunia
अतिवृष्टीमुळे पुराच्या वेढ्यात अडकलेल्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याची स्थिती अजूनही बिकट आहे. हवामान खात्याने आज आणि उद्या अतिवृष्टी चा इशारा दिला आहे. त्यामुळे धरणातील साठा वाढल्याने नद्यांची पाणी पातळी वाढणार आहे.
 
सांगली जिल्ह्यात मोठया प्रमाणात बचावकार्य सुरू आहे. लोकांची बाहेर येण्यासाठी धडपड सुरू आहे. अशातच एक बोट उलटून 16 ठार झाले आहेत. त्यात तीन मुलं, पाच महिला आणि आठ पुरूषांचा समावेश आहे. सांगलीतल्या पलूस तालुक्यातल्या ब्रम्हनाळमध्ये ही घटना घडली आहे. या बोटीत 30 लोक होते, अशी माहिती मिळत आहे.
 
कोल्हापूर आणि परिसरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
 
कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील अनेक मार्ग आजही बंद आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 112 बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगा नदीची पाणी पातळी 55 फुटांच्यावर गेलीय. कोल्हापूर शहरातील व्हीनस कॉर्नर परिसर बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आला आहे.
 
सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि कोयना नद्यांच्या पाणी पातळीत दर तासाला वाढ होतेय.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

सत्तेसाठी देशाचे तुकडे करायला मागेपुढे पाहत नाही,कंगना राणौतचा पुन्हा राहुल गांधींवर निशाणा

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या बसला भीषण अपघात, 3 जवान शहीद, 32 जखमी

प्रेम संबंधाच्या करणावरून तरुणाचा निर्घृण खून, पुण्यातील घटना

ठाण्यात शेजाऱ्याच्या पत्नीवर मुलीसमोर बलात्कार, आरोपीला अटक

ठाण्यातील व्यावसायिकाची 1.27 कोटी रुपयांची फसवणूक

पुढील लेख
Show comments