Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

2 व्यक्तींचा थंडीने गारठून मृत्यू, पशुधनालाही फटका

Webdunia
शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (10:47 IST)
राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे राज्यातील अनेक भागात तापमानात मोठ्या प्रमाणावर घट झाली होती. त्यामुळे धुकं आणि पाऊस एकत्र झाल्याचं पाहायला मिळालं.
 
पुण्यात येत्या तसेच मुंबई आणि उपनगरांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यातील हवामान बदलल्याचा फटका रबी पिकांना आणि पशुधनालाही बसल्याचे कळून येत आहे. काल अहमदनगरमध्ये घराबाहेर असलेल्या 20 मेंढ्यांचा गारठ्यामुळे मृत्यू झाला. तर आता शिर्डीत थंडीमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. शिर्डीत नगर-मनमाड रोडवर एक तर कणकुरी रोडवर एक असे दोन मृतदेह आढळून आले आहेत. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून ते मृतदेह ताब्यात घेतले. एका मृतदेहाजवळ काही कागदपत्रे आढळून आल्याने त्यावरुन ही व्यक्ती शिर्डीत उपचारासाठी आली असावी, असा अंदाज बांधला जात आहे. तर दुसऱ्या मृतदेहाजवळ मात्र काहीही आढळून आलेले नाही त्यामुळे ओळख पटलेली नाही.
 
लक्षद्वीप बेटापासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत पसरलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या महाराष्ट्रात पाऊस पडत असल्याचे चित्र आहे. अवकाळी पाऊस आणि थंडीमुळे पुणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये गारठून मेढ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आंबेगाव तालुक्यातील धोंडमाळ शिवार येथे 35, शिंगवे येथे 20 ते 25, खडकी येथे 45, पिंपळगाव म्हाळुंगे येथे 3, खातपूर बुद्रुक येथे 32, वळती येथे 23 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. तर अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पळशी गावात 25 बकऱ्यांचा गारठून मृत्यू झाला आहे. इतर ठिकाणी देखील मेंढ्यांचा मृत्यू झाला असून जिल्हा प्रशासनाकडून माहिती संकलित करण्यात येत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

चंद्रपूर : नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू

मुंबई : जुन्या वादातून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हाणामारीत तीन जणांचा मृत्यू

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

पुढील लेख
Show comments