Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाप्परे, आधार तीर्थ आश्रमामध्ये लहान मुलाचा गळा दाबून हत्या

Webdunia
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2022 (20:43 IST)
नाशिकच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या आधार तीर्थ आश्रमामध्ये एका लहान मुलाचा गळा दाबून हत्या करण्यात आली आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  त्रंबकरोड परिसरातील अंजनेरी भागात हे आधार तीर्थ आश्रम आहे. या आश्रमात राज्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं राहतात. मात्र या आश्रमातील एका चिमुकल्याची अशाप्रकारे हत्या झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. घटना उघडकीस येताच याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आलीये. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
 
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुला मुलींसाठीच्या त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातच एका चार वर्षाच्या मुलाची गळा अावळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या लहान मुलाच्या संशयास्पद मृत्यूची बातमी मिळताच पोलिस घटनास्थळीदाखळ झाले होते. पोलिसांच्या तपासानंतर या चिमुकल्याची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 
 
मृत चिमुकला अवघ्या चार वर्षांचा असून तो उल्हासनगर येथील होता. त्याचा माेठा भाऊ देखिल याच आश्रमात हाेता. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, नववीतील एका मुलाचे या लहान मुलाचे भांडण झाले हाेते त्यातूनच ही हत्या झाली का याचा तपास आता केला जात आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर असलेल्या तुपादेवी गावाजवळ अंजनेरी येथे हे आश्रम आहे. या आश्रमात मध्यरात्री ही घटना घडली. 
नववीच्या वर्गातील एका मुलाशी हत्या झालेल्या मुलाचे भांडण झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या हत्येचा भांडणाशी काही संबंध आहे का ? याची देखील कसून चौकशी सुरु आहे. दोघांमध्ये नेमके कोणत्या कारणावरून भांडण झाले होते ही माहिती अद्याप मिळू शकली नाहीये. 
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments