Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष रेल्वे धावणार

Webdunia
मंगळवार, 5 डिसेंबर 2023 (22:48 IST)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुबंईत चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी त्यांच्या अनुयायींची गर्दी असते. हे लक्षात घेता मध्य रेल्वे कडून 4 डिसेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान 16 अनारक्षित विशेष गाड्या धावणार आहे. नागपूर ते मुंबई 3 गाड्या , मुंबई ते नागपूर 5 गाड्या आणि मुंबई ते सेवाग्राम 1 गाडी धावणार आहे. 

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, नागपूर ते मुंबई विशेष गाडी नागपूर येथून 4 डिसेंबर रोजी रात्री 11:55 वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी दुपारी 3:30 वाजता सीएसएमटी पोहोचेल. तसेच नागपूर ते मुंबई अनारक्षित विशेष गाडी 5 डिसेंबर रोजी नागपुरातून सुटणार असून त्याच दिवशी रात्री 11:45 वाजता मुंबई पोहोचेल. 

नागपूर येथून विशेष गाडी क्रमांक 01266 5 डिसेंबर रोजी दुपारी 3:50वाजता निघणार असून ही गाडी 6 डिसेंबर रोजी मुंबईला सकाळी 10:55 वाजता पोहोचेल. या विशेष गाड्यांचा थांबा वर्धा, अजनी, सेवाग्राम, पुलगाव, धामणगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, कसारा, मलकापूर, जलम्ब, जळगाव, मनमाड, भुसावळ, चाळीसगाव, इगतपुरी, नाशिक रोड, दादर, कल्याण या स्थानकावर असेल. तर 6 डिसेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान मुंबई ते नागपूर, सेवाग्राम, अजनी या स्थानकावर 6 अनारक्षित विशेष गाड्या धावणार आहे. 
 
Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

राज ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघात प्रचार करणार,आदित्य ठाकरेला आव्हान देणार!

IND vs BAN: यशस्वी जैस्वालने रचला इतिहास,सुनील गावस्करांचा रेकॉर्ड मोडला

इस्रायलचा दावा- हिजबुल्लाचा कमांडर इब्राहिम अकील ठार

EY कर्मचाऱ्याच्या मृत्यूबद्दल अजित पवार यांची "तणावांमुळे तरुणांच्या मृत्यू" या विषयावर चिंता व्यक्त

मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवरून उडी मारून टॅक्सी चालकाची आत्महत्या

पुढील लेख
Show comments