Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पप्पू जे बोलतात ते सगळं खरं असतं का? हे पप्पू क्रमांक दोन आहेत

Webdunia
शनिवार, 29 ऑक्टोबर 2022 (08:19 IST)
२२ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचं ३० ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. राज्यातील आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातला गेल्यावरून सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यरोप सुरू आहेत. दरम्यान, माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. उद्योगांचा राज्यातील खोके सरकारवर विश्वास नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.
 
या टीकेला कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंचा उल्लेख ‘पप्पू’ असा केला आहे. “उद्योगांचा खोके सरकारवर विश्वास नाही” या आदित्य ठाकरेंच्या विधानाबाबत विचारलं असता सत्तार म्हणाले, पप्पू जे बोलतात ते सगळं खरं असतं का? हे पप्पू क्रमांक दोन आहेत. खोके कुणी घेतले? कसे घेतले? किती घेतले? कुठे घेतले? याचा हिशोबही त्यांनी द्यायला पाहिजे. सध्या मी पप्पूबद्दल फार बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

नाशिकमधील 16 ठिकाणे 31 मे पर्यंत नो ड्रोन फ्लाय झोन घोषित

LIVE: नाशिकमधील 16 ठिकाणे 31 मे पर्यंत नो ड्रोन फ्लाय झोन घोषित

सोलापूरच्या एमआयडीसीमधील सेंट्रल इंडस्ट्रीला भीषण आग, तीन जणांचा मृत्यू

DC vs GT: आज दिल्ली आणि गुजरातमध्ये रंगणार रोमांचक सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

RR vs PBKS: राजस्थान आणि पंजाब आज आमनेसामने येतील, संभाव्य प्लेइंग 11 जाणून घ्या

पुढील लेख
Show comments