Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेतकऱ्यांवरील या दडपशाहीची किंमत राज्यकर्त्यांना मोजावी लागेल - अजित पवार

Webdunia
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018 (18:01 IST)
दिल्लीत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर ज्याप्रकारे पोलिसांकडून बळाचा वापर झाला ते सरकारचे अपयश आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते Ajit Pawarयांनी केली आहे. असले सरकार शेतकऱ्यांवर गोळीबार करते, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडते, सरकार शेतकरीविरोधात लाठीचार्ज करते. हे सरकारंच शेतकरी विरोधात आहे तर यांच्याकडून काय अपेक्षा कराव्यात, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना आधारभूत किंमत नाही, कर्जमाफी नाही. एकीकडे मोठ्या उद्योगपतींना हजारो-कोटींची कर्जमाफी होते. मोठ्या बॅंकेमध्ये त्यांचे कर्ज माफ करण्याकरिता सरकार त्या ठिकाणी मोठी रक्कम देत आहे. त्यातच कोट्याधीश होणारी माणसे आपला पैसा लुबाडून परदेशात पळून जात आहेत व आपले सरकार बघ्याची भूमिका घेतंय. इथे मात्र जो शेतकरी संपूर्ण देशाला अन्न पिकवतो, धान्य पिकवतो, सगळ्यांना जगवतो. अशा या लाखाच्या पोशिंद्यावर हे लाठीचार्ज करतात. या राज्यकर्त्यांना याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा अजित पवार यांनी दिला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments