Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेताला पाणी द्यायचं होत म्हणून, तो मोटार चालू करायला गेला..!

Webdunia
शनिवार, 26 मार्च 2022 (08:14 IST)
नाशिक : पिकाला पाणी देण्याकरिता विद्युत मोटर सुरू करण्यासाठी गेलेल्या सोळा वर्षीय मुलास विजेचा जबर शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. येवला तालुक्यातील डोंगरगाव येथे ही घटना घडली.
 
करण बाळू तळे (१६) असे या मुलाचे नाव आहे. येवला तालुक्यातील डोंगरगाव येथे तळे कुटुंबीय राहत आहे. दरम्यान काल (दि.२४) दुपारच्या सुमारास करण पिकाला पाणी देण्यासाठी वीज पंप चालू करत असताना त्याला मीटर पेटी व्दारे विजेचा जबर धक्का बसला. विजेच्या धक्क्यानंतर तो खाली कोसळला. याबाबत आजूबाजूच्या शेतकऱ्यांना माहिती होताच घटनास्थळी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली.
 
यावेळी बेशुद्ध अस्वस्थेत असताना करणे चुलते संजय तळे यांनी तात्काळ त्यास येवला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉ. सोनवणे यांनी त्यास मृत घोषित केले. दरम्यान, करणचा असा अपघाती मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments