Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जळगाव जिल्हा ग.स.रणधुमाळी : पहिल्याच दिवशी १४९ अर्जांची विक्री तर ११ इच्छूक उमेदवारांनी भरले अर्ज

Webdunia
शनिवार, 26 मार्च 2022 (08:08 IST)
ग.स.सोसायटीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून आज पहिल्याच दिवशी तब्बल १४९ अर्जांची विक्री झाली आहे. महत्वाचे म्हणजे यंदा ५ पॅनल एकमेकांसमोर उभे राहिले असून निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही. पहिल्याच दिवशी ११ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे.
 
गेल्या अनेक महिन्यांपासून उत्सुकता लागून असणार्‍या सरकारी नोकरांच्या सहकारी पतसंस्थेच्या अर्थात ग.स.सोसायटीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरायला शुक्रवारी सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी १४९ अर्जांची विक्री होऊन ११ अर्ज उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. पहिल्या दिवशी नथ्थू पाटील, उदय पाटील, सुनील पाटील २ अर्ज, संदीप पवार, शैलेश राणे, गणेश पाटील, प्रवीण पाटील, अनिल सुरडकर, महेश पाटील, राम पवार यांनी अर्ज दाखल केला आहे.
 
ग.स.सोसायटीच्या २१ जागांसाठी ५ पॅनल उभे ठाकले आहेत. ग.स.सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून आजपासून अर्ज विक्री आणि अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीसाठी २५ ते ३१ मार्च या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. त्यांची छाननी झाल्यानंतर २८ एप्रिल रोजी या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून ३० एप्रिल रोजी मतमोजणी होवून निकाल घोषित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आल्याने हालचाली गतीमान झाल्या आहेत.
 
यंदाच्या निवडणुकीत एकूण ३२ हजार ३०० मतदार असून ज्यातील १७ हजार मतदार हे शिक्षक आहेत. २१ संचालकांच्या जागेसाठी मतदान पार पडणार असून त्यात राखीव जागेत ५ स्थानिक, ११ बाहेरील, २ महिला, १ एस.सी, १ वि.भ.ज तर १ ओबीसी जागेचा समावेश आहे. निवडणुकीत ५ पॅनल एकमेकांसमोर उभे राहिले आहे. निवडणुकीत लोकमान्य पॅनल विलास नेरकर, सहकार पॅनल उदय पाटील, लोकसहकार पॅनल मनोज पाटील, प्रगती पॅनल रावसाहेब पाटील, स्वराज पॅनल आर.के.पाटील यांचे पॅनल रिंगणात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघात, कार नदीत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी मिळून इतिहास रचला, आणखी एक मेगा रेकॉर्ड लक्ष्यावर असेल

तिबेट, बंगालचा उपसागर आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले

सोलापूर : कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू, केंद्र आणि राज्य सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली

पुढील लेख
Show comments