Dharma Sangrah

दोन ठार, औरंगाबादेत नेट बंद, अफवा पासरवाल तर तुमची खैर नाही

Webdunia
शनिवार, 12 मे 2018 (15:10 IST)
0

किरकोळ करणातून झालेल्या दंगलीचे औरगाबाद येथे मोठे पडसाद उमटले आहे. दोन गटाच्या भांडणातून उसळलेला हिंसाचार नियंत्रणात आला आहे. या हिंसाचारात  40 जण जखमी झाले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. काल  रात्री साडे अकरा वाजता उसळलेल्या हिंसाचारावर पोलिसांनी  नियंत्रण मिळवल आहे. मात्र हिंसाचार ग्रस्त भागात शंभर ते दीडशे गाड्या आणि चारशे ते साडे चारशे दुकानांना आगी लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे वातावरण अजूनही तापले आहे.  दोन गटात झालेल्या दगडफेकीत 35 ते 40 जण जखमी झाले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून काही भागात संचारबंदी आहे. आणि पूर्ण औरंगाबादमधलं इंटरनेट बंद करण्यात आले आहे. मात्र जर का अफवा पसरवली तर मग पोलिस कठोर कारवाई  करतील असा इशारा दिला आहे.  आय घटनेत जखमींमध्ये एका एसीपीचा समावेश आहे. हिंसाचार ग्रस्त भागात एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी कोणत्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पोलिसांना सहकार्य करा, असं नम्र आवाहन वेब दुनिया करत आहे. कारण आता हिंसाचार थांबला असून, पोलिस कारवाई करत आहे.मोतीकारंजा परिसरातील अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यावरून झालेल्या वादातून दोन गट शुक्रवारी रात्री राडा झाला होता. काही लोकांच्या चुकीमुळे पूर्ण शहर वेठीस धरले गेले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

लग्नाची खरेदी करण्यासाठी निघालेल्या एका महिलेचा चायनीज मांज्याने गळा कापला गेला

भारत भगवा होता आणि राहील'एआयएमआयएम नेत्यांच्या विधानावर कृष्णा हेगडे यांनी प्रत्युत्तर दिले

गतविजेत्या मॅडिसन कीजचा प्रवास ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत संपला, जेसिका पेगुलाचा क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश

350 प्रवाशांचे जहाज बुडाले, 18 मृतदेह हाती

LIVE: 27 जानेवारीपासून मुंबईत पाणीकपात होणार

पुढील लेख
Show comments