Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Ladki Bahin Yojna लाडक्या बहिणींना लवकरच कर्जही मिळणार

Webdunia
सोमवार, 12 मे 2025 (12:29 IST)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेद्वारे, गरीब महिलांना दरमहा १५०० रुपये वाटले जातात. राज्य सरकारने जुलै ते मार्च या कालावधीत या योजनेद्वारे आतापर्यंत २ कोटी ४१ लाख रुपये वाटप केले आहे. तसेच २ मे २०२५ पासून, लाडकी बहीणयोजनेचा एप्रिलचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच अनेक महिलांना योजनेअंतर्गत 1500 रुपये मिळत आहे. काहींना त्यांच्या खात्यात थेट ४५०० रुपये मिळाले आहे. तर काही महिलांना फक्त ५०० रुपयांवर समाधान मानावे लागले. मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. महिलांना पैसे मिळण्याची प्रक्रिया २ मे पासून पुढील २ ते ३ दिवस सुरू राहील. या कालावधीत, सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.  
ALSO READ: भीषण अपघातात 13 जणांचा जागीच मृत्यू
तसेच माहिती सामोर आली आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांसाठी आता महाराष्ट्र सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. माहितीसमोर आली आहे की, लाडक्या बहिणींना 40 हजार रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य मिळणार आहे. यावेळी अजित पवारांनी लाडक्या बहिणींना एक आनंदाची बातमी दिली आहे. अजित पवार म्हणाले की, लाडक्या बहिणींना आता 40 हजार रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे आणि त्या कर्जाचा हप्ता योजनेतून वळता करता येईल. तसेच ते पुढे म्हणाले की महाराष्ट्र सरकार बँकांसोबत चर्चा करणार आणि व्यवसायासाठी भांडवल म्हणून 40 हजार रुपये कर्ज देणार आहे.
ALSO READ: भाजप नेत्या नवनीत राणा यांना पाकिस्तानातून आली जीवे मारण्याची धमकी
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: पुणे: कर्वेनगर परिसरात हमास समर्थक पोस्टर्समुळे गोंधळ, तरुणांना मारहाण

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ मे पर्यंत २९ बेकायदेशीर बंगले पाडले जातील

बीड : दोरीने बांधले, केळी-टरबूजाची साले खायला देऊन जन्मदात्या वडिलांनीच क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या

काका आणि पुतण्या यांच्यात जवळीक वाढली का? शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा

नागपूर : तलावात गटाराचे पाणी, मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ मे पर्यंत २९ बेकायदेशीर बंगले पाडणार, सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला कोट्यवधींचा दंड

पुढील लेख
Show comments