Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पराभवानंतर हिमालयात जाण्याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले....

Webdunia
रविवार, 17 एप्रिल 2022 (10:16 IST)
"कोल्हापूरमध्ये निवडणूक हरल्यास मी हिमालयात जाईन," असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. आता उत्तर कोल्हापूरच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने चंद्रकांत पाटील यांचं हे वक्तव्य चर्चेत आहे.

चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार का? असा प्रश्न राजकीय नेते उपस्थित करत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी याबाबत पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे.
 
ते म्हणाले, "आमचे नाना कदम लढले तर तुमच्या तोंडाला फेस आला. मी लढलो तर काय होईल? मी असं म्हटलं होतं की, मी लढलो आणि जिंकलो नाही तर हिमालयात जाईन. मी लढलोच नाही. नाना लढले."
 
"कोल्हापूरमध्ये तीन पक्ष विरुद्ध भाजपा एकट्याने निवडणूक लढली. विकासाचे मुद्दे मांडले आणि हिंदुत्वाबाबत लपवाछपवी केली नाही. पराभव का झाले याचे चिंतन करण्यात येईल. भाजपमध्ये 15 महिला आमदार आहेत.

जयश्री जाधव भाजपच्या होत्या पण त्यांनी महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवली. काँग्रेस सत्तेत असल्याने त्यांनी असं केलं. आम्ही सत्तेत असतो तर आमच्याबाजूने लढल्या असत्या."

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांचा मतदारसंघ कोथरुडमध्ये 'दादा, हिमालयात कधी जाताय?' असे बॅनर शिवसेनेने लावले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: नाशिकमधील 16 ठिकाणे 31 मे पर्यंत नो ड्रोन फ्लाय झोन घोषित

भारताच्या युकी भांब्रीने जोडीदार गॅलोवेसह शानदार कामगिरी उपांत्यफेरीत प्रवेश केला

नाशिकमधील 16 ठिकाणे 31 मे पर्यंत नो ड्रोन फ्लाय झोन घोषित

सोलापूरच्या एमआयडीसीमधील सेंट्रल इंडस्ट्रीला भीषण आग, तीन जणांचा मृत्यू

DC vs GT: आज दिल्ली आणि गुजरातमध्ये रंगणार रोमांचक सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

पुढील लेख
Show comments