Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ, पुराचे संकट

Webdunia
मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (13:28 IST)
जळगाव जिल्ह्यात पावसाने काल रात्रीपासून दमदार हजेरी लावली आहे.जळगावच्या भडगाव,पाचोरा आणि चाळीसगावामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून,रस्ते,घरं,दुकानं पाण्याखाली गेली आहे. रस्त्यावरील  वाहने पाण्याखाली बुडाले आहे.चाळीसगाव अहमदनगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.सध्या जळगाव जिल्ह्यात पुराची स्थिती निर्माण झाली आहे. 

चाळीसगाव मध्ये पुराचे पाणी गिरणा न तितूर नदीत मिळाल्याने जवळच्या गावात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.मुसळधार पाऊस असल्यामुळे इथे वीजपुरवठा खंडित झाला आहे.अनेक गावांशी सम्पर्क तुटला आहे.प्रशासनाकडून उपाययोजनेला सुरुवात झाली आहे.चाळीसगावाततील कन्नड घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.चाळीसगावात धरण पूर्णपणे तुडुंब भरले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.त्यामुळे त्या काठावरील गावांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने पुढील 3 -4 दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देखील सांगण्यात आले आहे. सध्या राज्यात ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढल्यामुळे औरंगाबाद मध्ये दरड कोसळली असून औरंगाबादातील पाझर तलाव फुटला आहे.    
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments