Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Eknath Shinde: मराठा समाजासाठी लढणारा बुलंद नेता हरपला -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Webdunia
रविवार, 14 ऑगस्ट 2022 (15:14 IST)
एकनाथ शिंदे यांनी विनायक मेटे यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे. विनायक मेटे यांच्या निधनाची बातमी अत्यन्त दुर्देवी आहे. या घटनेवर विश्वास ठेवणे अवघड आहे. मराठा समाजासाठी सातत्याने लढणारा नेता , सामाजिक चळवळीचा बुलंद आवाज, धडाडीचे नेतृत्व करणारा नेता आज आपल्यातून हरपला. अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावण्या व्यक्त करत मेटे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मी आजच मुंबई येथे बैठक बोलावली होती. त्या बैठकीला मेटे उपस्थित राहणार होते. त्यासाठीच ते निघाले असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली आणि आपल्यातून हिरावून नेले. 
 
तर, उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी दुःख व्यक्त करताना म्हटले की, गरीबीतून दिवस काढत मेटे यांनी आपले आयुष्य उभे केले होते. गेल्याच महिन्यात त्यांचा मी वाढदिवस साजरा केला होता. मराठा समाजाला नेतृत्व देणारे व्यक्तीमत्व आज हरपले आहे. काळाने त्यांना आपल्यातून हिरावून नेले आहे.
 
दुर्देवी म्हणजे की अपघात झाल्यावर देखील दोन तास रुग्णवाहिका आली नाही . हा घातपात होता की अपघात  या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी मराठा मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील आणि इतर कार्यकर्त्यांनी केली आहे. 
 
मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
विनायक मेटे हे मराठा आरक्षणाच्या आजच्या बैठकीला येण्यासाठी निघाले होते. त्याचवेळी त्यांचं अपघाती निधन झालं आहे. मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांची भावना होती, शासन त्यासोबत आहे, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अमळनेरजवळ मालगाडी रुळावरून घसरली, नंदुरबार-सुरत रेल्वे मार्ग विस्कळीत

LIVE: परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेस स्मार्ट केल्या जातील

पुण्यातील व्यावसायिकाला पाकिस्तानकडून धमकी

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

पुढील लेख
Show comments