Marathi Biodata Maker

आज आणखी एक ठाकरे चोरायचा प्रयत्न करत आहेत, घेऊन जा-उद्धव ठाकरें

Webdunia
बुधवार, 20 मार्च 2024 (09:05 IST)
भाजपाने शिवसेना फोडून एकनाथ शिंदेंना सोबत घेत महायुती सरकार स्थापन केलं. त्यानंतर, शिवसेनेतील मोठा गट भाजपासोबत गेल्यामुळे शिवसेना पक्षावर दाव करत एकनाथ शिंदेंनी पक्ष आणि चिन्ह मिळवलं आहे. निवडणूक आयोगानेच त्यांना पक्ष आणि चिन्ह दिल्यानंतर उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंवर सातत्याने निशाणा साधला जात आहे. तुमच्या बापाच्या नावाने मतं मागा, माझा बाप कशाला चोरता, असे म्हणत उद्धव ठाकरेंकडून शिंदेंना लक्ष्य केलं जात आहे. बाळासाहेब ठाकरे हे नाव बाजूला करुन तुम्ही मत मागा, असा सल्लाही ठाकरेंकडून भाजपाला देण्यात येत आहे. आज पुन्हा एकदा नांदेड येथील सभेतून उद्धव ठाकरेंनी भाजपावर हल्लाबोल केला.
 
''भाजपाचा सगळा खोटारडेपणा आहे. शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही, आपत्ती निवारण योजना मिळाली नाही. मोदींनी म्हटलं होतं, मी उत्पादन खर्च दुप्पट करेन, तोही झाला नाही. लागवडीचा खर्च वाढला आहे, खतांचा खर्च वाढला आहे. बियाणं तरी अस्सल मिळतंय का?,'' असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी भाजपावर बोचरी टीका केली.  
''अस्सल बियाणं भाजपातच नाही, तर ते शेतकऱ्यांना काय देणार. यांचं बियाणं सगळं बोगस आहे, हे सगळे बाहेरुन घेतात माणसं. आजही कोणीतरी घेतलंय त्यांनी. कारण, त्यांना माहितीय, महाराष्ट्रात मत मिळवायची असेल तर मोदी नावावर मत मिळत नाहीत. तर, आजही ते ठाकरे नावावरच मिळतात. म्हणून बाळासाहेबांचा फोटो चोरला, आज आणखी एक ठाकरे चोरायचा प्रयत्न करत आहेत, घेऊन जा..'' असे म्हणत उद्धव ठाकरेंना भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, राज ठाकरेंच्या महायुतीतील प्रवेशावरुन बोचरी टीकाही केली.

Edited By -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबईच्या मानखुर्द परिसरात तीन मजली चाळ कोसळली

आयएमडीने सोमवारी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला

ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने सातव्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला

विद्यार्थ्यांना मोठा धक्का, महाराष्ट्रासह देशभरातील ५८ अभियांत्रिकी महाविद्यालये बंद झाली

मुंबईत मुसळधार पावसात झाड कोसळून वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

पुढील लेख
Show comments