Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अघोरी कृत्य! विवाहितेला खाऊ घातली मानावी हाडांची राख; कारण हादरवून टाकणारे

Webdunia
सोमवार, 23 जानेवारी 2023 (15:15 IST)
विद्येचे माहेरघर म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या पुण्यामध्ये अघोरी कृत्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये विवाहितेला स्मशानातील राख आणि हाडांचा चुरा जबरदस्तीने खावू घातल्याचे उघड झाले आहे. पुणे शहरामधील धायरी भागात हा प्रकार २०१९ पासून सुरू होता. पीडित महिलेने सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.
 
पत्नीला आरोपी पती तसेच घरातील इतर जणांनी संगनमत करून शारीरिक आणि मानसिक छळ करून वारंवार मारहाण करून शिवीगाळ केल्याचा हा प्रकार पुणे शहरातील धायरी भागात २०१९ पासून सुरू होता. पीडित महिलेने सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला लग्न झाल्यापासून पतीसह घरच्यांनी अनेक वेळा पैशांची मागणी केली होती.
 
एका अमावस्येच्या दिवशी रात्री सर्वजण जवळच्या स्मशानभूमीमध्ये गेले. तिथे जळालेल्या मृतदेहाची काही हाडे गोळा केली आणि राख मडक्यात घेतली. ते सर्व घरी आणून त्याची पूजा करण्यात आली. मडक्यामधील राख पाण्यामध्ये टाकून ते पाणी फिर्यादीला पिण्यासाठी दिले. यानंतर फेबुवारी २०२१ मध्ये जावेच्या निगडी येथील घरी पूजा करण्यात आली. त्यासाठी मृत माणसाचे हाडे, केस, घुबडाचे पाय आणि कोंबडीचे धड हे सर्व जावेच्या आईवडिलांनी आणून ठेवले होते. मांत्रिक महिलेने अघोरी पूजा केली. त्यानंतर डोक्याला पिस्तूल लावून हाडाची पावडर करून ती फिर्यादीला खायला सांगितली.
 
याबरोबरच सासरचे लोक महिलेला लग्नामध्ये मिळालेले दागिने आणण्यासाठी अनेक वेळा मागणी करून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचे. घरामध्ये भरभराट व्हावी तसेच महिलेला मुलगा व्हावा यासाठी पतीसह सासू-सासरे, दीर आणि जावेने मिळून अघोरी आणि जादूटोणा करून पूजादेखील घातली होती. सासरच्या जाचाला कंटाळून अखेर या महिलेने पोलिसांत धाव घेतली.
 
पती जयेश पोकळे, दीर श्रेयस पोकळे, ईशा पोकळे, सासरे कृष्णा पोकळे, सासू प्रभावती पोकळे, दीपक जाधव आणि बबिता जाधव अशी आरोपींची नावे आहेत. या सर्वांवर सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघात, कार नदीत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी मिळून इतिहास रचला, आणखी एक मेगा रेकॉर्ड लक्ष्यावर असेल

तिबेट, बंगालचा उपसागर आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले

सोलापूर : कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू, केंद्र आणि राज्य सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली

पुढील लेख
Show comments