Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एसटी संपामुळे विद्यार्थीनीचा हकनाक बळी; धावत्या रिक्षेतून तोल गेल्याने अपघाती मृत्यू

Webdunia
शनिवार, 26 मार्च 2022 (08:02 IST)
जळगाव : राज्यात एसटी बंद (ST Strike) असल्याचा फटका थोरा-मोठ्यांसह सर्वांनाच बसतोय.मात्र आता हाच संप जीवावर बेतल्याचीही घटना समोर आली आहे. जळगावात एसटी अभावी रिक्षातून प्रवास करणाऱ्या विद्यार्थीनीचा धावत्या रिक्षेतून तोल गेल्याने अपघाती (Accident) मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. तृप्ती भगवान चौधरी असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. तिच्या कुटुंबियांसह गावात शोककळा पसरली आहे.
 
तृप्ती चौधरी ही विद्यार्थिनी बोदवड येथील न.ह.रांका कॉलेजमध्ये अकरावी विज्ञान शाखेला शिकत होती. ती एसटीने प्रवास करायची मात्र गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरु असल्याने एसटी बंद आहे. त्यामुळे तृप्ती रिक्षानेच महाविद्यालयात ये जा करत होती. कॉलेज सुटल्यानंतर मैत्रिणींसोबत शेलवड येथे घरी ऑटोरिक्षाने निघाली. यावेळी ती प्रवासी वाहतूक करणार्‍या खाजगी रिक्षाच्या पुढील सीटवर बाहेरील बाजूने बसली होती. यावेळी प्रवासात अचानक हात निसटून तोल गेल्याने तृप्ती व तिची मैत्रिण रोहिणी राजेंद्र धनगर या दोन्ही धावत्या रिक्षातून खाली पडल्या. तृप्ती बाहेरच्या साईडने असल्याने तिच्या डोक्याला व मेंदूला गंभीर मार लागला. यानंतर तिला तातडीने बोदवड येथील डॉ.यशपाल बडगुजर यांच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. पण, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी जळगावला हलविण्याचा सल्ला दिला. जळगावला नेत असताना वाटेत तृप्तीची प्राणज्योत मालवली. जळगाव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर तृप्तीवर दुपारी 4 वाजता शेलवड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अमळनेरजवळ मालगाडी रुळावरून घसरली, नंदुरबार-सुरत रेल्वे मार्ग विस्कळीत

LIVE: परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेस स्मार्ट केल्या जातील

पुण्यातील व्यावसायिकाला पाकिस्तानकडून धमकी

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

पुढील लेख
Show comments