Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 9 June 2025
webdunia

चारित्र्याच्या संशयावरुन प्रियकरानं महिलेसह तिघांना संपवलं, आरोपी ताब्यात

arrest
, शनिवार, 18 जून 2022 (08:33 IST)
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील मौजे वेलंग या गावच्या हद्दीत चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने महिलेचा गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर महिलेच्या दोन लहान मुलांना वेलंग गावानजीक असणाऱ्या विहिरीत ढकलून दिल्याची घटना घडली आहे. दत्ता नारायण नामदास असं संशयित आरोपीचं नाव असून या घटनेनंतर संशयित आरोपी दत्ता नामदास हा त्याच्या मूळ गावी अकलूज याठिकाणी निघून गेला होता. दरम्यान या प्रकरणात रहिमतपूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी दत्ता नामदास यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
 
संबंधित महिला ही आपल्या पतीपासून विभक्त प्रियकरासोबत राहत होती. 15 जून रोजी रात्रीच्या सुमारास चारित्र्याच्या संशयावरून दत्ता नामदास आणि योगिता यांच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं. जेवण झाल्यानंतर दत्ता याने योगीताचा गळा दाबून हत्या केली. यानंतर दोन मुलांना रात्री विहिरित ढकलून दिलं. समीर आणि तनु अशी लहान मुलांची नावं आहेत. हत्या करून आरोपीने वेलंग येथील राहत्या घराला बाहेरून कडी लावून अकलूजला पलायन केलं. दरम्यान हा प्रकार स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ रहिमतपूर पोलिसांना याची माहिती दिली.
 
पोलिसांनी संशयित आरोपी दत्ता नारायण नामदासला ताब्यात घेतलं असून मानभाऊच्या मळ्यातील विहिरीतून मुलांचा मृतदेह बाहेर काढत आले आहेत. या घटनेने सातारा जिल्हा खळबळ उडाली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सरकारी नोकरीची नामी संधी; पगार मिळेल लाखांपेक्षा जास्त