Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपातच अनेक लोकांचे पक्ष प्रवेश होणार : फडणवीस

Webdunia
सोमवार, 21 डिसेंबर 2020 (16:38 IST)
सत्ताधाऱ्यांकडून पुंग्या सोडण्यात येत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तसेच, भाजपातून कुणीही कुठेही जाणार नाही, याउलट भाजपातच अनेक लोकांचे पक्ष प्रवेश होणार असल्याचं भाकीतही भाजप नेते, विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. नाशिक येथील माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.  
 
येत्या काळात अनेक लोकांचे भाजपात प्रवेश होणार आहेत, काहीजण रोज वावड्या उठवतात की भाजपाचे लोक आमच्याकडं येणार आहेत. पण, कोणी त्यांच्याकडे जाणार नाहीत, हे त्यांनाही माहिती आहे. त्यांच्याच पक्षातील नाराज आमदारांना संकेत देण्यासाठी या पुंग्या वाजवत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. तिन्ही पक्षात अनेक आमदार नाराज आहेत, त्यामुळे त्यांना दिलासा मिळावा, म्हणून असं बोललं जात असल्याचं फडणवीस यांनी सांगितंल. तसेच, सर्वांना हेही माहितीय की, देशाचं भविष्य हे राहुल गांधी नाही, युपीए नाही. तर, या देशाचं वर्तमान आणि भविष्य हे नरेंद्र मोदीच आहेत. त्यामुळे, एकादं धोक्यानं आलेलं सरकार किती काळ चालतं? कसं चालतं, यासंदर्भातील सगळी माहिती सगळ्यांना आहे. या तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन लढावं ही तर माझीच इच्छा आहे, त्यांनी जरुर लढावं, असं आव्हानंही फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना दिलंय.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

नवीन

समृद्धी हायवेवरील १८ लाख रुपयांच्या दरोड्याचा ४८ तासांत पर्दाफाश, ७ आरोपींना अटक

LIVE: SIR अंतर्गत आज महाराष्ट्राच्या मतदार याद्यांचा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला

नवीन नियम १ सप्टेंबरपासून – LPG, दूध, ITR आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाशी संबंधित बदल लागू

झोमॅटोचे मोठे पाऊल: भेसळयुक्त आणि बनावट दुग्धजन्य पदार्थ विकणाऱ्या रेस्टॉरंट्सना प्लॅटफॉर्मवरून हटवले जाणार

दोन कोटी मतदार कायमचे बाद झाले असं समजू नका, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचं वक्तव्य

पुढील लेख
Show comments