Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल कुठलीही चर्चा झाली नाही : जयंत पाटील

No discussion
Webdunia
शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (07:23 IST)
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. या विषयावर माध्यमांशी बोलताना राज्य सरकारमधील वरिष्ठ मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल कुठलीही चर्चा झाली नाही असे सांगितले.
 
“धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल केलं जात होतं. त्या संदर्भात त्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी योग्य ती पावलं उचलावी एवढी अपेक्षा होती, पण ती पावलं उचलली गेली नाहीत, त्यामुळे धनंजय मुंडे हायकोर्टात गेले” असे जयंत पाटील यांनी सांगितले.
 
“पोलिसांना तपास करुं दे. त्यातून योग्य तो निष्कर्ष निघेल. आपण निष्कर्षापर्यंत पोहोचण्याची घाई करु नये. पोलीस योग्य ती पावले उचलतील. आम्ही पोलिसांच्या तपासात हस्तक्षेप करणार नाही” असे जयंत पाटील यांनी सांगितले.
 
“या प्रकरणात एक महिला वाट्टेल ते आरोप करुन, राजकीय व्यक्तीमत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतेय. त्याची योग्य ती दखल आपण घ्याल” असा विश्वास जंयत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

नागपूरमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'तिरंगा रॅली'चे केले नेतृत्व

Pakistani spy आठवी पास सिक्योरिटी गार्ड, ISI एजंट... कोण आहे नोमान इलाही ? ज्याने देशाविरुद्ध कट रचला

राज्यभरात वळवाच्या पावसाचा कहर

ईडीने मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकत 30 कोटींची रोकड जप्त केली

तुर्की-अजरबैजान भारतीय पर्यटकांचा स्ट्राइक

पुढील लेख
Show comments