rashifal-2026

ओखी वादळाच्या नुकसानग्रस्त शेतकरी व मच्छिमारांना मदत करण्याची मागणी

Webdunia
सोमवार, 18 डिसेंबर 2017 (17:55 IST)

ओखी वादळामुळे कोकणातील आंबाकाजूसुपारीकांदा तसेच इतर पिकांच्या बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची लक्षवेधी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी आज सभागृहात उपस्थित केली. यावेळी झालेल्या चर्चेत राष्ट्रवादीचे आमदार हेमंत टकले ,किरण पावसकर , विद्या चव्हाण यांनी सहभागी होत प्रश्न उपस्थित केले.

 ओखी वादळाचे संकट नवे असून अशा संकटांना पुढील काळात तोंड देण्यासाठी राज्य सरकारने आपल्या यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्याची गरज असल्याचे मत टकले यांनी व्यक्त केले. आंब्याचे मोहर येणार नसल्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे. हे नुकसान सध्या दिसत नसले तरी ते नुकसानच असते. त्यामुळे प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन पंचनामे करणार काअसा प्रश्न पावसकर यांनी विचारला. बोंडअळी किंवा उर्वरित महाराष्ट्रात शेतीच्या नुकसानीचे जे निकष लावले जातातते निकष कोकणातल्या फळबागांना लावून जमणार नाहीअशी भूमिका किरण पावसकर यांनी मांडली.

 कोकणावर नेहमीच अन्याय केला जातो. शेती व मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यात दुजाभाव होत असल्याची टीका विद्या चव्हाण यांनी केली. किती नुकसान झाले याची तपासणी करण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. ओखीसारख्या वादळाचा प्रश्न नवीन आहे. याबाबत कोकणातील सर्व सदस्यांना सर्वांनी एकत्र घेत बैठक घेऊ असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: मुख्यमंत्री फडणवीस यांनी रूपाली चाकणकर यांना तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिले

मध्य रेल्वेच्या ट्रान्सहार्बर लाईनवर मेगा ब्लॉक लागू करण्यात येणार; ठाणे आणि वाशी/नेरुळ दरम्यान लोकल सेवा स्थगित

रूपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा; मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आदेश

महाराष्ट्रातील शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द; एप्रिल ते जून दरम्यान जनगणनेचे काम होणार

टीम इंडियाची आणखी एका दौऱ्याची घोषणा; वर्षाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार

पुढील लेख
Show comments