Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘ओखी’ग्रस्तांना सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी : भास्कर जाधव

Webdunia
गुरूवार, 21 डिसेंबर 2017 (15:22 IST)

हिवाळी अधिवेशनात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव  यांनी ओखी वादळाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या आणि मच्छिमार बांधवांच्या व्यथा मांडल्या. तसेच त्यांना सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याचेही मत व्यक्त केले.

जाधव म्हणाले की ओखी वादळामुळे कोकणातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पण हे सरकार त्यांना मदत करण्याऐवजी उलटसुलट उत्तरे देत आहे आणि मूळ प्रश्न आणि मागणीला बगल देत आहे. ‘ओखीमुळे झालेल्या बोटीच्या नुकसानीला चार हजार रुपये मदत आणि फळपिकांना सहा ते सात हजार एकरी मदत देणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. पण ही मदत पुरेशी नाही. कोकणातील फळ पिकविम्यात बदल करावा, वाढती महागाई लक्षात घेता कोकणातील फळपिक पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी किमान एक लाख मदत देण्यात यावी. मच्छिमारांचे ‘एनसीडीसी’चे कर्ज माफ करावे आणि मच्छिमारी हा शेती व्यवसाय म्हणून जाहीर करावा, अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments