Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कॉंग्रेसची २५ ऑगस्टला निघणार ‘पोलखोल यात्रा’

Webdunia
सोमवार, 19 ऑगस्ट 2019 (10:08 IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपविरोधातील काँग्रेसची ‘पोलखोल यात्रा’ २० ऑगस्ट ऐवजी २५ ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. २० ऑगस्ट रोजी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती असल्याने ही यात्रा पुढील ढकलण्यात आली आहे. कॉंग्रेस नेते नाना पटोले ही यात्रा काढणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मोजरी गावातून महाजनादेश यात्रेस सुरुवात केली होती तिथूनच कॉंग्रेसही पोलखोल यात्रा सुरू करणार आहे .
 
दरम्यान, कोल्हापूर, सांगलीच्या पुरग्रस्तांसाठी राज्य सरकारने काढलेल्या जीआरबाबत नाना पटोले यांनी अकोला येथे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यावर ‘दुसरा बाजीराव पेशवा आणि फडणवीस यांचे काम सारखेच’ अशी टीका केली होती. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यास नंदुरबार येथून सुरुवात होणार आहे. तर पैठण येथील संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेस १९ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

धक्कादायक : मुंबईत अडीच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी आई सोबत प्रियकराला अटक

LIVE: मुंबईत 'सिंदूर यात्रा' काढली जाणार

‘भारत धर्मशाळा नाही...’, श्रीलंकेतून येणाऱ्या तमिळ निर्वासितांवर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी

मुख्यमंत्री योगी यांचा मोठा निर्णय, गोरखपूरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधणार

पंजाबमध्ये २ पाकिस्तानी हेरांना अटक, ISI ला लष्करी तळांची माहिती देत ​​होते

पुढील लेख
Show comments