suvichar

कोकणात जोरदार पाऊस, रत्नागिरी जगबुडी नदीला पूर, रस्ता पूर्ण बंद

Webdunia
शुक्रवार, 6 जुलै 2018 (08:39 IST)
मागील दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे खेडमधील नारिंगी आणि जगबुडी पुलावरुन पाणी गेले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद केली. जगबुडीच्या पाण्याची पातळी आठ मीटरच्यावर असून, रात्री उशिरापर्यंत पाणी वाहत होते. त्यामुळे  दोन्ही बाजूला पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. कोणताही अपघात अनुचित प्रकार घडू नये म्हणून मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.  
 
रायगडमध्ये दासगावमध्ये दरड कोसळून महामार्ग सुमारे सात तास ठप्प होता. त्यात आता भर म्हणून जगबुडी पूल वाहतुकीस बंद केली आहे. त्यामुळे धीम्या गतीने होणारी महामार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा ठप्प झाली. पावसाचा जोर वाढत गेल्याने खेड पोलिसांकडून जगबुडी पूल वाहतुकीस बंद केला आहे. अगदी काही काळ  एक-एक वाहन सोडण्यात येत होते. नदीत पाणी वाढल्याने पूर्णपणे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. एसटी बसच्या अनेक फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोकणात किवा जवळपास जाणे सध्या टाळलेले गरजेचे आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

नागपूर महानगरपालिकेचा ७५ वा वर्धापनदिन, शहराला ७५ नवीन उद्याने आणि ७५ खेळाची मैदाने मिळणार

वऱ्हाडाच्या स्कॉर्पिओ गाडीची आणि समोरून येणाऱ्या बसची भीषण धडक, ६ जणांचा जागीच मृत्यू

मुंबई ते संभाजीनगर ड्रग्ज रॅकेट प्रकरणी ४ आरोपींना अटक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे मौन

अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा

पुढील लेख
Show comments