Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रोहित पवार यांनी राज ठाकरेंनी केलेल्या विधानाचा अर्थ सांगितला

Rohit Pawar explained the meaning of the statement made by Raj Thackeray Maharashtra News Regional News In Marathi Webdunia Marathi
Webdunia
शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (15:38 IST)
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीपातींमधील द्वेष वाढल्याचे वक्तव्य राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार वाचण्याचा सल्ला दिला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरेंनी केलेल्या विधानाचा अर्थ सांगितला आहे. यावेळी रोहित पवारांनी भाजपाला देखील चिमटा काढला आहे.
 
रोहित पवार म्हणाले, “राज ठाकरे हे अद्भूत वक्तृत्व शैली असलेले नेते आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘लाव रे तो व्हिडिओ च्या वादळी सभांमुळं उडालेली धूळ डोळ्यात गेल्याने भाजपचे भले-भले नेते अजूनही डोळे चोळतायेत. त्यामुळं त्यांच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ असतो.”
 
“राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर लगेच लोकांनी डोक्यावर घेतलेल्या या पक्षाला खाली आणायचं असेल तर एकच पर्याय होता, तो म्हणजे जातीयवाद वाढवणं! म्हणून विरोधकांनी विकासाऐवजी जाती-धर्माच्या नावावर समाजात ताण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असाच राज साहेबांच्या बोलण्याचा अर्थ निघतोय!” असे रोहित पवार म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रेमविवाह योग्य आहे की अयोग्य? प्रेमानंद जी महाराज म्हणाले, जर त्यांच्या मुलांनी असे पाऊल उचलले तर पालकांनी काय करावे?

अपमृत्युहरं महामृत्युञ्जय स्तोत्रम Apamrutyuharam Mahamrutyunjjaya Stotram

४ जून रोजी महेश नवमीला चंद्र कन्या राशीत भ्रमण करेल, या ३ राशींचे बिघडलेले काम पूर्ण होईल

तूळ राशीच्या मुलींसाठी नावे अर्थासहित

सतत बसण्याची सवय हृदयरोगाचा धोका वाढवते, सतर्क व्हा

सर्व पहा

नवीन

भंडारा जिल्ह्यात बस आणि टॅक्टरच्या झालेल्या भीषण टक्कर मध्ये चालकाचा दुर्दैवी मृत्यू

LIVE: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्र समृद्धी महामार्गच्या अंतिम फेरीत पोहोचले

मुंबई सेंट्रल स्टेशनवर ट्रेनमधून उतरतांना प्रवाशाची मान अडकल्याने मृत्यू

सोलापूर-पुणे महामार्गावर प्रवाशांनी भरलेली बस उलटली, २० जणांची प्रकृती गंभीर

नाशिकमध्ये एक सुखी कुटुंब उद्ध्वस्त झाले, लग्नातून परतताना झालेल्या अपघातात ६ जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments